AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींना वेश्या म्हणणाऱ्या अनिरुद्धाचार्यांवर रामदेव बाबा संतापले, म्हणाले, ‘आपण त्यांना गुरु…’

अनिरुद्धाचार्य यांनी मुलींना वेश्या असं म्हणात वादग्रस्त विधान केले आहे. आता योगगुरू रामदेव बाबा यांनी अनिरुद्धाचार्य यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुलींना वेश्या म्हणणाऱ्या अनिरुद्धाचार्यांवर रामदेव बाबा संतापले, म्हणाले, 'आपण त्यांना गुरु...'
Ram dev Baba
| Updated on: Aug 27, 2025 | 7:38 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून कथावाचक अनिरुद्धाचार्य आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. अनिरुद्धाचार्य यांनी मुलींना वेश्या असं म्हणात वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता अनिरुद्धाचार्य यांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. अशातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी अनिरुद्धाचार्य यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशा लोकांना गुरु म्हणणे थांबवलं पाहिजे असं रामदेव बाबा म्हणाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. बाबा रामदेव म्हणाले की, ‘सनातन धर्माचे गुरु किंवा संन्यासी ते आहेत ज्यांनी देशासाठी उद्योग, आरोग्य, शिक्षण यामध्ये योगदान दिले आहे. ज्याचे भारताला भारत बनवण्यात कोणतेही योगदान नाही, जो मूर्खपणे बोलत आहे तो सनातन धर्माचा गुरु असू शकत नाही. आपण अशा लोकांना गुरु म्हणवून घेणे बंद करायला पाहिजे.’

पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, ‘जीवनात चारित्र्य, पवित्रता आणि पुरुषत्व असले पाहिजे. मात्र सनातन धर्माचे अनेक गुरु लोक उपदेशाच्या नावाखाली फसवणूक करतात. धर्मग्रंथातील एका श्लोकावर बोलताना बाब म्हणाले की, उपदेश करण्यात ना तथ्य आहे, ना विज्ञान आहे ना सत्य आहे, त्यांनी आता अशा गोष्टी बोलणे बंद करायला हवे.

अश्लील गोष्टींबद्दल बोलणे म्हणजे…

अनिरुद्धाचार्य यांच्या मुलींच्या चारित्र्याबद्दल विधानावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाचे आचरण चांगले असले पाहिजे. कोणत्याही वर्गाला लक्ष्य करणे आणि अश्लील गोष्टींबद्दल बोलणे हे स्वतःच एक अश्लीलता आहे. कोणताही सुसंस्कृत माणूस अशाप्रकारते विधान करु शकत नाही. सामान्य लोकांनीही अश्लील गोष्टींबद्दल बोलू नये. कोणावरही टीका करू नये. एखाद्याविषयी वाईट बोलणे खूप चुकीचे आहे.’

अमेरिकेच्या टॅरिफवरही भाष्य

अमेरिकेने भारतावर लादलेल्या करावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, देशातील उत्पादन वाढवण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. दुसऱ्या देशातून वस्तू आपल्या देशात येऊ नये यासाठी त्यांनी कर लादला आहे. मात्र अमेरिकेला आयातीशिवाय पर्याय नाही. कारण अमेरिकेत कामरांचा पगार आणि कच्चा माल महाग आहे, त्यामुळे अमेरिका आपले उत्पादन वाढवू शकत नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.