AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा

मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. तसेच दर देखील गगनाला भीडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये रशियाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
putinImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 10:03 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे आखाती देशांमधून होणारा एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यात भरीस भर म्हणून युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यांनं भारतच नाही तर जगातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दरम्यान आता युद्धविरामाची घोषणा देखील झाली आहे. मात्र तरी देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केलेला नाहीये, एका दिवसात केवळ 15 च जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी इराणने दिली आहे. त्यामुळे जगावर अजूनही ऊर्जा संकट कायम आहे. आता अशा परिस्थितीमध्ये रशिया भारताच्या मदतीला पुन्हा एकदा धावून आला आहे.

मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. युद्धापूर्वी रशिया भारताला सवलतीच्या दरात तेल उपलब्ध करून देत होता. मात्र युद्ध सुरू असताना रशियानं भारताला सवलतीच्या दरात तेल निर्यातीस नकार दिला. कच्च्या तेलाच्या किंमती वाढवल्या. मात्र भारताला पाहिजे तेवढं तेल मिळेल असं रशियानं म्हटलं होतं. हा भारतासाठी एक प्रकारे मोठा दिलासाच होता. मात्र आता ऐन संकटाच्या काळात पुन्हा एकदा रशिया भारतासाठी धावून आला आहे.

मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे, मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना आता रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. रशिया भारताला तब्बल 40 टक्के सवलतीच्या दरात एलएनजी LNG चा पुरवठा करणार आहे. सध्या मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आधीच गॅसचा तुटवडा आहे, तसेच दर देखील गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये रशियानं घेतलेला हा निर्णय भारतासाठी एक प्रकारे जॅकपॉटच म्हणावा लागेल, यामुळे भारतासारख्या देशांचा मोठा फायदा होणार आहे. कारण भारत हा ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात इतर देशांवर अवलंबून आहे.

Follow Us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, कोणाला मिळाली संधी?
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, यादी आली समोर; कोणाला संधी मिळाली?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप