Sabrimala Gold Stolen: इतकं सोपं आहे का 4.5 किलो सोनं चोरणं? कुठे गायब झालं सबरीमाला मंदिरातील सोनं?

Sabrimala Gold Stolen: केरळच्या सबरीमाला मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यातून सोने गायब झाल्याची घटना सध्या चर्चेत आहे. मंदिरामधून ४७४.९० ग्रॅम सोने रहस्यमय पद्धतीने चोरीला गेले होते. या चोरीची संपूर्ण कहाणी चला जाणून घेऊया...

Sabrimala Gold Stolen: इतकं सोपं आहे का 4.5 किलो सोनं चोरणं? कुठे गायब झालं सबरीमाला मंदिरातील सोनं?
Sabrimala gold Scam
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 04, 2025 | 3:57 PM

केरळच्या सबरीमाला मंदिरातून सोने गायब झाल्याची घटना सध्या खूप चर्चेत आहे. मंदिरातील ४७४.९० ग्रॅम सोने रहस्यमय पद्धतीने चोरीला गेले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने सोमवारी स्पॉन्सर उन्नीकृष्णन पोट्टी यांना अटक केली होती. पण तुम्हाला माहितीये का २०१९ चे सबरीमाला मंदिर चोरी प्रकरण काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

२०१९ साली केरळच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याची चोरी झाली होती. हे ते मंदिर आहे जिथे दरवर्षी लाखो भाविक भगवान अयप्पांच्या दर्शनासाठी येतात. मंदिरातून सुमारे ४.५ किलोग्रॅम सोने चोरीला गेले होते. त्या वेळी चोरी झालेल्या सोन्याची किंमत ५५ लाख रुपये होती. हे सोने मंदिराच्या गाभाऱ्यात (संक्टम संक्रोरम) आणि द्वारपालक मूर्तींच्या प्लेटिंगसाठी वापरले गेले होते. प्रत्यक्षात, जेव्हा मंदिर प्रशासनाने या सोन्याच्या प्लेट्स पुन्हा प्लेटिंगसाठी पाठवल्या, तेव्हा दस्तऐवजात गडबड आढळली. चौकशीत समोर आले की वापरलेले सोने हे बनवाट किंवा भेसळयुक्त आहे.

सबरीमाला मंदिरातील चोरीची संपूर्ण कहाणी

आश्चर्याची बाब म्हणजे, २०१९ मध्ये सोन्याची परत चढवलेल्या द्वारपालक प्लेट्स इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी दिल्या गेल्या, त्या वेळी एन वासु हे टीडीबीचे अध्यक्ष होते. त्यांनी याआधी कमिश्नर म्हणूनही काम केले होते. हाच तो काळ होता जेव्हा उन्नीकृष्णन पोट्टी यांना सोने चढवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याच काळात मंदिरातील मौल्यवान सोने रहस्यमय पद्धतीने गायब झाले. पोट्टी यांनी तेव्हा वासु यांना पत्र लिहिले होते.

सबरीमाला मंदिराचे सोने कोणी चोरले?

त्या पत्रात उन्नीकृष्णन पोट्टी यांनी दावा केला होता की इलेक्ट्रोप्लेटिंगनंतर काही अतिरिक्त सोने शिल्लक राहिले आहे. त्यांनी सुचवले होते की ही शिल्लक रक्कम एखाद्या गरीब महिलेच्या लग्नासाठी मदत म्हणून वापरली जावी. पण आता जेव्हा एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी सुरू केली, तेव्हा ते पत्र महत्त्वाचा पुरावा ठरले आहे. एसआयटी टीडीबीच्या इतर सदस्यांकडूनही चौकशी करणार आहे. चौकशी पथक मंदिराच्या गाभाऱ्यातून गायब झालेले सोने शोधण्यात लागले आहे. नेमके कोणत्या टप्प्यात, कोणाच्या माध्यमातून आणि कधी बेपत्ता झाले हे शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. दरम्यान, असा अंदाज आहे की एसआयटीची ही दुसरी अटक प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते.