AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : बिस्किट असो किंवा शॅम्पू, कोरोनानंतर भारतीयांची खरेदीची पद्धत बदलली, नेमकी कशी जाणून घ्या

भारतात कोरोना महामारीनंतर नागरिकांची खरेदीची पद्धत बदलली आहे. आधी लोक महिन्याच्या खर्चानुसार महिन्यातून एकदा सर्व राशन घेण्यासाठी जायचे आणि नंतर कमतरता भरून काढायचे. पण ऑनलाइन वस्तु घेणे हे दहा वर्षांपासून उपलब्ध होत होत्या. मात्र कोविडच्या काळात यामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळाला.

What India Thinks Today : बिस्किट असो किंवा शॅम्पू, कोरोनानंतर भारतीयांची खरेदीची पद्धत बदलली, नेमकी कशी जाणून घ्या
| Updated on: Feb 26, 2024 | 6:55 PM
Share

नवी दिल्ली |  TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या सत्रात, FMCG क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यावर Zydus Wellness चे CEO तरुण अरोरा यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यांनी असेही सांगितले की आता भारतात वस्तूंच्या छोट्या पॅकेजिंगची मागणी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रमाण कोरोनानंतर वाढल्याचंही ते म्हणाले.

खरेदीची पद्धत बदलण्याची कारणे

कोविडनंतर जगभरात महागाई झपाट्याने वाढली. त्यामुळे जगभरातील पुरवठा साखळी प्रभावित होऊन त्याचा परिणाम जगभरात दिसून आला. महागाईचा सगळ्यांनाच फटका बसला, पण त्याचा सर्वाधिक फटका कमी उत्पन्न गटातील लोकांना बसला. त्याचा लोकांच्या मागणीवर आणि खरेदी पद्धतीवरही परिणाम झाल्याचं तरुण अरोरा म्हणाले.

महागाईमुळे ग्रामीण भागातील मागणीवर परिणाम झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था उंचावत चालली आहे, पण ग्रामीण भागातील लोक आपला खर्च कमी करत आहेत. मोठ्या पाकिटांऐवजी लहान पाकिटांची खरेदी. अशा परिस्थितीत, ई-कॉमर्स, ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापारामुळे त्यांची पोहोच वाढत आहे, परंतु देशातील वस्तूंचा खप कमी होत असल्याचं अरोरा यांनी सांगितलं.

शहरांमध्ये झपाट्याने वाढली मागणी

तरुण अरोरा यांनी शहरांमधील मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावतही स्पष्ट केली. ते म्हणाले की, येथे लोकांचा हॉटेल, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांवर होणारा खर्च वाढत आहे कारण तेथे पैसा येत आहे. परंतु जर आपण एफएमसीजीच्या स्तरावर नजर टाकली तर लोकांमध्ये प्रीमियम उत्पादनांवर होणारा खर्च वाढत आहे, जरी ते कमी प्रमाणात खरेदी करत असले तरीही. ऑनलाइन मार्केटमुळे त्यांना लक्झरी आणि प्रीमियम उत्पादने मिळवणेही सोपे झालं आहे, असं तरूण अरोरा म्हणाले.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.