केवळ एकच लग्न झालेल्या व्यक्तीला राज्यात राहण्याचा अधिकार, या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मोठं विधान
समान नागरिक कायद्याबाबत बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. आता केवळ एकच लग्न झालेल्या व्यक्तीला मध्य प्रदेशात राहण्याचा कायदेशीरदृष्या अधिकार असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

समान नागरिक कायद्याबाबत बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. आता केवळ एकच लग्न झालेल्या व्यक्तीला मध्य प्रदेशात राहण्याचा कायदेशीरदृष्या अधिकार असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना यादव असंही म्हणाले की, जर देशात एक देश, एक प्रधान आणि एक निशाण अशी व्यवस्था पाहिजे तर मग एकाच देशात राहणार्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या कायद्याची काय गरज आहे? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदौरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलं होतं की, जर भगवान राम एकच लग्न करत असतील तर रहीमकडून देखील एकाच लग्नाची अपेक्षा केली गेली पाहिजे.
मुस्लिम महिला या आमच्या बहिणी आहेत, त्यांना देखील समान अधिकार मिळाले पाहिजेत, आमचा उद्देश कोणत्याही समाजासोबत भेदभाव करणे नसून, प्रत्येक नागरिकांना समान कायदा आणि समान अधिकार मिळून देणे आहे. त्यामुळे आता जो एकच लग्न करेल त्यालाच मध्य प्रदेशात कायदेशीररित्या राहण्याचा अधिकार असेल, असं मोहन यादव यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी ते तीन तलाकवर देखील बोलले आहेत. जर कोणी तीन तलाकसारखी गोष्ट केली तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, तीन तलाक सारख्या गोष्टी आता हद्दपार झाल्या आहेत.
आम्ही समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, प्रत्येकाला समान अधिकार मिळाले पाहिजेत, समान कायदा असला पाहिजे, हीच खरी लोकशाहीची ओळख आहे. दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या या विधानाचं उत्तर प्रदेशचे शाही चीफ मुफ्ती मौलाना चौधरी इफ्राहीम हुसैन यांनी समर्थन केलं आहे. मुख्यमंत्री जे बोलले ते योग्यच बोलले, आम्ही मुख्यमंत्र्याच्या विधानाचं कौतुक करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. मुस्लिम धर्म देखील हेच सांगतो की कोणत्याही समाजाची बहीण असेल मुलगी असेल किंवा कोणीही असेल कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे, असं, त्यांनी म्हटलं आहे.