AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजच्या विजयाने 2024 मध्ये हॅट्ट्रिकची हमी, मोदींनी तेलंगणाच्या जनतेला दिला खास संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील उत्कृष्ट कामगिरीचे वर्णन ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. राजस्थानमधील भाजपच्या विजयावर ते म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही, असे मी भाकीत केले होते.

आजच्या विजयाने 2024 मध्ये हॅट्ट्रिकची हमी, मोदींनी तेलंगणाच्या जनतेला दिला खास संदेश
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 03, 2023 | 9:24 PM
Share

PM modi Speech : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजप मुख्यालयात उपस्थित कार्यकत्यांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले. तर दुसरीकडे तेलंगणातील जनतेलाही त्यांनी एक विशेष संदेश दिला. पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही लोक म्हणत आहेत की आजच्या हॅटट्रिकने 2024 च्या हॅट्ट्रिकची हमी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बहुमत मिळाले आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झालाय. भाजप मुख्यालयात केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, या निकालांची प्रतिध्वनी खूप दूर जाईल. या निवडणुकांचा प्रतिध्वनी जगभर ऐकू येईल. भाजपच्या सेवेच्या भावनेला पर्याय नाही हे मध्य प्रदेशने पुन्हा दाखवून दिले आहे. मी माझ्या पहिल्याच भेटीत छत्तीसगडच्या कुटुंबीयांना सांगितले होते की, मी तुमच्याकडून काहीही मागत नाही तर तुम्हाला आमंत्रण देत आहे. शपथविधी मी द्यायला आलो आहे.

तेलंगणासाठी खास संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी तेलंगणातील जनतेचे आणि तेलंगणातील भाजप कार्यकर्त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो, प्रत्येक निवडणुकीत तेलंगणात भाजपचा आलेख सातत्याने वाढत आहे, मी तेलंगणातील कार्यकर्त्यांना आश्वासन देतो की भाजप तुमच्या सेवेत कोणतीही कसर सोडणार नाही. यावेळी त्यांनी विरोधकांनाही खडसावले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीने निवडणुकीदरम्यान अनेक चुकीचे शब्द वापरले. विरोधकांनी सुधारावे अन्यथा जनता त्यांना कायमची सत्तेवरून दूर करेल.

Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य