AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे 100 किमीच्या वेगाने धावत होती, आपत्कालीन खिडकीतून आठ वर्षीय मुलगी पडली, पुढे चमत्कारच घडला…

railway emergency window: घटनेची माहिती मिळाल्यावर ललितपूर जीआरपीला माहिती दिली. ललितपूर पोलिस स्टेशनच्या जीआरपी प्रभारींनी 16-17 किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर गौरीचा शोध घेण्यासाठी तातडीने 4 टीम तयार केल्या. येथून जीआरपी आणि कुटुंबीयही शोध घेत होते. जंगलात ट्रेन जिथे थांबली होती तेथून काही अंतरावर रुळाच्या बाजूला झुडपात मुलगी रडताना दिसली.

रेल्वे 100 किमीच्या वेगाने धावत होती, आपत्कालीन खिडकीतून आठ वर्षीय मुलगी पडली, पुढे चमत्कारच घडला...
railway emergency window (file Photo)
| Updated on: Oct 15, 2024 | 6:04 PM
Share

railway emergency window: उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना घडली आहे. परंतु त्याचवेळी चमत्कारही घडला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. शंभर किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वेत आपत्कालीन खिडकीजवळ आठ वर्षांची मुलगी बसली होती. ती मुलगी धावत्या रेल्वेतून खिडकीतून बाहेर पडली. काही वेळाने तिच्या आई-वडिलांचा लक्षात हा प्रकार आला. मग रात्रीच्या वेळी ट्रेन थांबवण्यात आली. गाडी दहा ते पंधरा किलोमीटर पुढे आली होती. अखेर ती मुलगी मिळाली. तिच्याबाबत चमत्कार झाला होता. ती मुलगी झाडांमध्ये अडकून पडली होती. तिला काही जखमा झाल्या होत्या. परंतु ती वाचली होती.

कुटुंब गेले होते मध्य प्रदेशात

वृंदावन येथील रंगनाथ मंदिराजवळ राहणारे अरविंद तिवारी, त्यांची पत्नी अंजली यांच्याबाबत ही घटना घडली. त्यांची ८ वर्षांची मुलगी गौरी ही वाचल्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे आभार मानले. हे कुटुंब मध्य प्रदेशातील टिकमगड येथे नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. अष्टमीची पूजा करून ते शुक्रवारी गीता जयंती एक्सप्रेस ट्रेनने मथुरेला येत होते. ललितपूर रेल्वे स्थानकापासून 7-8 किमी अंतरावर हा अपघात झाला. या घटनेत मुलीचा एक पाय फॅक्चर झाला होता.

ट्रेनमधून पडलेली गौरी म्हणते…

ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून पडलेली गौरी म्हणाली, मी ट्रेनच्या खिडकीजवळ बसले होते. भावासोबत खेळत होतो. ट्रेनची खिडकी उघडी होती. अचानक वळण आले आणि जोरदार वाऱ्यामुळे मी खिडकीतून पडली. माझ्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे मला उभे राहता येत नव्हते. सुमारे 2 तास ती झाडीत पडून रडत होती. मला अंधाराची भीती वाटत होती. मग आई-बाबा आले.

गौरीची आई अंजली म्हणाली, माझी मुलगी सुखरूप परत आल्याने आम्ही सर्व आनंदात आहोत. नवरात्रीमध्ये देवीने एक चमत्कार केला आहे. हा चमत्कार मी कधीही विसरणार नाही. माझ्या मुलीचा दुसरा जन्म झाला आहे.

जीआरपी पोलिसांनी सांगितले…

ट्रेनमध्ये असलेल्या जीआरपी पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यावर ललितपूर जीआरपीला माहिती दिली. ललितपूर पोलिस स्टेशनच्या जीआरपी प्रभारींनी 16-17 किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर गौरीचा शोध घेण्यासाठी तातडीने 4 टीम तयार केल्या. येथून जीआरपी आणि कुटुंबीयही शोध घेत होते. जंगलात ट्रेन जिथे थांबली होती तेथून काही अंतरावर रुळाच्या बाजूला झुडपात मुलगी रडताना दिसली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.