Video : बिहारमध्ये RJD कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, तेजस्वी आणि तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Mar 23, 2021 | 3:13 PM

पोलिसांनी बळाचा वापर करत आरजेडी कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्जही केला. यावेळी आरजेडी कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेकही करण्यात आली. यात अनेक पोलीस कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधीही जखमी झाले आहेत.

Video : बिहारमध्ये RJD कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, तेजस्वी आणि तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

नवी दिल्ली : बिहारमधील वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव
घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आरजेडी कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्जही केला. यावेळी आरजेडी कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेकही करण्यात आली. यात अनेक पोलीस कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधीही जखमी झाले आहेत. वातावरण अधिक गंभीर बनल्यानंतर पोलिसांनी तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांना ताब्यात घेतलं आहे.(Police lathicharges RJD activists in Bihar, Tejaswi Yadav and Tej Pratap Yadav in custody)

बिहारमधील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी तेजस्वी यादव आणि आरजेडी कार्यकर्ते पाटण्याताली जेपी. गोलंबर इथे जमले. त्यांनी विधानसभेवर कूच करण्याची तयारी केली. पण जिल्हा प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यानंतर आरजेडी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेरिस पोलिसांनीही बळाचा वापर केला.

पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज

आरजेडीच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. राजधानीमध्ये या आंदोलनादरम्यान वातावरण तणावपूर्ण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. आंदोलक ऐकायला तयार नाहीत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला.

तेज प्रताप यादव यांचं ट्वीट

“वाढती बेरोजगारी, सरकारची क्रूर वृत्तीविरुद्ध आम्ही शांततेत निदर्शनं करत होते. पण आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला, पोलिसांनी दगड फेकले. समस्यांची सोडवणूक करण्यापेक्षा बिहारवासियांवरच अशाप्रकारे अन्याय सुरु झाला आहे”, असं ट्वीट करत तेज प्रताप यादव यांनी नितीश कुमार सरकारवर टीका केलीय.

इतर बातम्या : 

केवळ महाराष्ट्रच नव्हे, ‘या’ राज्यांनाही 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण हवंय!

Kabaddi in Telangana: तेलंगणाच्या सूर्यापेटमधील कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली, 50 हून अधिक जखमी

Police lathicharges RJD activists in Bihar, Tejaswi Yadav and Tej Pratap Yadav in custody