AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत जोडो यात्रेतील पोस्टरमुळे काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत…

ज्यावेळी भारत जोडो यात्रेच्या पोस्टरवर सावरकरांचे छायाचित्र असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी सावरकरांच्या जागी बापूंचा फोटो लावला.

भारत जोडो यात्रेतील पोस्टरमुळे काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 21, 2022 | 7:53 PM
Share

नवी दिल्लीः सध्या काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) जोरदारपणे सुरू आहे. भारत जोडो यात्रा ही केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात पोहोचताच काँग्रेसकडून (Congress) एक चूक झाली आहे. भारत जोडोच्या पोस्टरमध्ये विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचा फोटो इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या रांगेत लावला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडूनच स्पष्टीकरण देऊन ही प्रिटींग मिस्टेक असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसने सावरकरांना कधीही स्वातंत्र्यसैनिक मानले गेले नाही. इंग्रजांबरोबर लढण्याऐवजी त्यांनी फक्त त्यांची माफी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केरळचे अपक्ष आमदार पी. व्ही अन्वर यांना एलडीएफचा पाठिंबा आहे. तर या प्रकरणावरुन सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी सांगितले आहे की, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून चेंगमनाड येथे लावण्यात आलेल्या फलकांमध्ये सावरकरांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

ज्यावेळी भारत जोडो यात्रेच्या पोस्टरवर सावरकरांचे छायाचित्र असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या जागी बापूंचा फोटो लावला.

त्यावेळी मुस्लिम लीगने हे पोस्टर कर्नाटकातील असल्याचे सांगितले. जिथे भाजपने स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पोस्टर लावले होते, परंतु पोस्टर केरळचेच होते हे काही वेळानंतर स्पष्टही झाले आहे. महात्मा गांधींच्या फोटो लावून आता सावरकरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या पोस्टरवर सावरकरांचा फोटो असल्यामुळे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले की, “वीर सावरकरांचे फोटो एर्नाकुलम (विमानतळाच्या जवळ) काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेला शोभून दिसतात असंही म्हटले आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 150 दिवस चालणार असून 3,570 किमीचा प्रवास करणार असल्याचे सांगण्यात आले. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ही यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ही यात्रा आता जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.

Follow Us
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर