AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात झाला असून अंगावर उकळतं स्टील पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत.

मोठी बातमी! थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत
visakhapatnam steel plant accidentImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 7:06 PM
Share

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात झाला असून अंगावर उकळतं स्टील पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. प्लांटच्या एसएमएस-2 आणि एसटीसी-3 हीट फॅसिलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात वितळलेल्या स्टीलची गळती झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

वितळलेले स्टील असणारे भांडे फुटले…

समोर आलेल्या माहितीनुसार, उच्च तापमानावर वितळलेल्या स्टीलने भरलेला लॅडल (मोठे स्टील भांडे) अचानक फुटल्याने हा अपघात झाला. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचारी व अधिकारी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळताना दिसले. ही दुर्घटना स्टील प्लांटच्या एसएमएस-2 (SMS-2) आणि एसटीसी-3 (STC-3) हीट एफजी विभागात घडली.

नेमकं काय घडलं?

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, क्रेनच्या सहाय्याने उकळत्या स्टीलला वर उचलले जात होते. सुमारे 1500 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर असलेले हे स्टीलचे भांडे अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि उकळते स्टील खाली काम करणाऱ्या कामगारांवर कोसळले. अपघातानंतर स्टील प्लांटची अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीररीत्या भाजले गेले, तर काही कामगार भीतीपोटी घटनास्थळावरून पळून गेले.

प्रशासनाला मदतीच्या सूचना

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वांगलापुडी अनीता यांनी विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये झालेल्या भीषण अपघाताची तात्काळ दखल घेतली. त्यांनी फोनवरून विशाखापट्टणम जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच दुर्घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य अधिक वेगाने राबवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वांगलापुडी अनीता तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. त्या सतत फोनद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना देत आहेत.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?