WITT 2024 : मुलांना जन्म देताना महिलांना ज्या वेदना होतात त्याची किंमत कोण सांगेल?; स्मृती ईराणी यांचा सवाल

महिला नेतृत्व असलेल्या विकासाची चर्चा करण्याची गजर आहे. स्त्रिया घरात काम करतात. कुणाची तरी आई घरात काम करते. कुणाची तरी पत्नी घरात काम करते. त्यांच्या कामाची कुठेच नोंद होत नाही. स्त्रिया नऊ महिने त्यांच्या पोटात मुलाला वागवते. मुलाला जन्म देताना महिलांना ज्या पीडा होतात, वेदना होतात, त्याची किंमत कोण करणार? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केला.

WITT 2024 : मुलांना जन्म देताना महिलांना ज्या वेदना होतात त्याची किंमत कोण सांगेल?; स्मृती ईराणी यांचा सवाल
Smriti Irani
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 26, 2024 | 4:41 PM

नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : व्हॉट्स इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट सुरू झालेली आहे. कालपासून या समीटमध्ये विविध विषयावर मंथन सुरू आहे. देशाच्या आर्थिक विकासापासून ते एआयएच्या दस्तकपर्यंतच्या विषयावर मंथन सुरू आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. राजकारणापासून ते मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. देशातील बड्या हस्तींनी तर या कार्यक्रमात हजेरी लावलीच पण विदेशातील दिग्गजांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी नारी शक्ती विकसित भारत या विषयावर आपलं मत मांडलं. भारताच्या स्वातंत्र्यात महिलांचं योगदान मोठं आहे, असं सांगतानाच स्मृती ईराणी यांनी राणी लक्ष्मीबाईंचं उदाहरण दिलं. राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीला बांधून इंग्रजांविरोधात दोन हात केल्याचंही स्मृती ईराणी यांनी आवर्जुन सांगितलं.

त्याची किंमत कोण सांगेल?

स्मृती ईराणी यांनी यावेळी लैंगिक समानतेवरही भाष्य केलं. मुलांना जन्म देताना महिलांना ज्या वेदना होतात त्याची किंमत कोण सांगेल?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. सहा महिन्यांची मॅटर्निटी लिव असेल, महिला आरक्षण बिल असेल… याबाबत स्मृती ईराणी यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांच्या राजकीय प्रवासावरही विचारण्यात आलं. तसेच तुम्ही अनेकांच्या रोल मॉडल आहात, असंही सांगण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं.

आपण केवळ महिलांच्या समस्या उजागर करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी तुम्ही दुसऱ्या पुरुषांसाठी काय केलं? असा सवाल पुरुषांना करत नाही. महिला जेव्हा काहीही करतात तेव्हा तुम्हीच आमची प्रेरणा आहात असं सांगितलं जातं. पण एखादा पुरुषही दुसऱ्या पुरुषाची प्रेरणा असू शकतो ना. आपण केवळ आपल्या जेंडरचं बर्डन घेऊन वावरत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

महिला तसूभर कमी नाहीत

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पीएम मोदींनी महिलांना एक वेगळी ओळख आणि बळ दिलं आहे. त्यांनी महिलांना अर्थव्यवस्थेचा बरोबरीचा भागीदार मानलं आहे. 90 मिलियन महिलांना सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडलं आहे. आज भारतातील महिला कुणापेक्षाही तसूभरही कमी नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

अशी लढाई कुणी लढलीय का?

नारीशक्तीवर बोलताना त्यांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख केला. स्वातंत्र्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यांनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांच्या विरोधात लढाई लढली होती. जगातील कोणत्याही देशात एखाद्या महिलेने स्वातंत्र्यासाठी अशी लढत दिली होती काय? म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासासोबत वारशावरही जोर देऊन बोलत असतात असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us