
Harish Rana : भारतीय नायिक इतिहासात बुधवार म्हणजेच 11 मार्च 2026 हा दिवस वेगळा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 13 वर्षांपासून दुर्धर आजारामुळे पलंगावर खिळून पडलेल्या हरिश राणा या 31 वर्षीय व्यक्तीची लाईफ सस्टेनिंग ट्रिटमेंट काढून घेण्यास परवानगी दिली आहे. म्हणजेच न्यायालयाने एका प्रकारे हरिश राणा यांच्या मृत्यूला परवानगी दिली आहे. ते गेल्या 13 वर्षांपासून चेतनाहीन अवस्थेत एकाच जागेवर पडून आहेत. न्यायालायने त्यांची लाईफ सपोर्ट सिस्टिम काढून घेण्यास परवानगी दिल्यानंतर आता भारतात इच्छा मरणासाठी काय कायदा आहे? त्याची प्रक्रिया कशी पार पडते? याबाबत जाणून घेऊ या…
हरिश राणा हे पंजाब विद्यापीठाचे विद्यार्थी होते. 2013 साली त्यांच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. पीजीवर राहात असताना ते चौथ्या मजल्यावरून खाली पडले. या अपघा तामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. परिणामी ते 100 टक्के ‘क्वाड्रीप्लेजिक डिसअॅबिलिटी’ या आजाराने ग्रर्स्त झाले. ते गेल्या 13 वर्षांपासून पर्मनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटममध्ये (ब्रेन डॅमेजची अवस्था) आहेत. म्हणजेच त्यांचे शरीरा चेतनाशून्य आहे. आपल्या मुलाची ही अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी न्यायालयाचे दार ठोठवून माझ्या मुलाला या कठीण आयुष्यातून मुक्तता द्या, अशी मागणी केली. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यानंतर वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयाने हरीश राणा यांची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्याचा आदेश दिला.
भारतात कोणाला इच्छामरण हवे असेल तर प्रसिव्ह युथेनेशिया ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत रुग्णाला विष देऊन थेट मारून टाकले जात नाही. रुग्ण जिवंत राहावा यासाठी ज्या यंत्रणा, मशीन, तंत्रज्ञान आहे, ते सगळे काढून टाकले जाते. म्हणजेच व्हेंटिलेटर, फिडिंग ट्यूब अशी साधने काढून टाकली जातात आणि नंतर रुग्णाचा मृत्यू होऊ दिला जातो.
दरम्यान, आता हरिश राणा यांच्याबाबतीतही याच प्रक्रियेचे पालन केले जाण्याची शक्यता आहे. जगभरात इच्छामरणाचे नियम वेगवेगळे आहेत. भारतात मात्र याबाबतीत कठोर नियमांचे पालन केले जाते.