AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदू नाही राहिला, तर जग नाही राहणार…मणिपूरमध्ये मोहन भागवत असं का म्हणाले?

RSS Chief Mohan Bhagwat : "आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही डिपेंडेंट असता कामा नये. आपल्याकडे इकोनॉमिक एबिलिटी, मिलिट्री एबिलिटी आणि नॉलेज एबिलिटी असली पाहिजे.

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदू नाही राहिला, तर जग नाही राहणार...मणिपूरमध्ये मोहन भागवत असं का म्हणाले?
RSS Chief Mohan Bhagwat
| Updated on: Nov 22, 2025 | 12:11 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता, समाज आणि राष्ट्र शक्ती याचा उल्लेख केला. या दरम्यान मोहन भागवत म्हणाले की, “आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यात हिंदू समाज राहणार. जर हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही” “परिस्थितीचा विचार सर्वांना करावा लागतो. परिस्थिती येते-जाते. जगातील सगळ्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आली. काही देश त्यात समाप्त झाले. यूनान, इजिप्त आणि रोमा सगळे संपले” असं भागवत म्हणाले.

“भारत हे एका अमर समाज, अमर सिविलायजेशनच नाव आहे. बाकी आले, चमकले आणि निघून गेले. या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला आहे. आपण आताही आहोत आणि राहणार. कारण आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यामुळे हिंदू समाज राहणार. हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही. कारण हिंदू समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शन करत असतो. हे आपलं ईश्वर प्रदत्त कर्तव्य आहे” असं मोहन भागवत म्हणाले.

पण तो आवाज दडपू दिला नाही

भागवत म्हणाले की, “प्रत्येक समस्येचा अंत शक्य आहे. त्यांनी नक्षलवादाचं उदहारण दिलं. जेव्हा समाजाने ठरवलं की, हे सहन करायचं नाही, तेव्हा हे संपलं” “ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्याचा अस्त नाही व्हायचा. पण भारतात त्यांच्या सूर्यास्ताची सुरुवात झाली. त्यासाठी आपण 90 वर्ष प्रयत्न केले. 1857 ते 1947. दीर्घकाळ स्वातंत्र्यासाठी आपण लढत होतो. तो आवाज कधी आपण दबू दिला नाही. कधी आवाज कमी झाला, कधी वाढला. पण तो आवाज दडपू दिला नाही” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

आपलं लक्ष्य काय पाहिजे?

मोहन भागवत यांनी आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर भर दिला. देशाने कधी कोणावर अवलंबून राहू नये. “आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही डिपेंडेंट असता कामा नये. आपल्याकडे इकोनॉमिक एबिलिटी, मिलिट्री एबिलिटी आणि नॉलेज एबिलिटी असली पाहिजे. ती वाढली पाहिजे. देश सुरक्षित, समृद्ध राहिला पाहिजे. कुठलाही नागरिक दु:खी, दरिद्री आणि बेरोजगार राहू नये हे आपलं लक्ष्य पाहिजे. सगळ्यांनी देशासाठी काम करुन आनंदात रहावं” असं मोहन भागवत म्हणाले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत