AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदू नाही राहिला, तर जग नाही राहणार…मणिपूरमध्ये मोहन भागवत असं का म्हणाले?

RSS Chief Mohan Bhagwat : "आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही डिपेंडेंट असता कामा नये. आपल्याकडे इकोनॉमिक एबिलिटी, मिलिट्री एबिलिटी आणि नॉलेज एबिलिटी असली पाहिजे.

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदू नाही राहिला, तर जग नाही राहणार...मणिपूरमध्ये मोहन भागवत असं का म्हणाले?
RSS Chief Mohan Bhagwat
| Updated on: Nov 22, 2025 | 12:11 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता, समाज आणि राष्ट्र शक्ती याचा उल्लेख केला. या दरम्यान मोहन भागवत म्हणाले की, “आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यात हिंदू समाज राहणार. जर हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही” “परिस्थितीचा विचार सर्वांना करावा लागतो. परिस्थिती येते-जाते. जगातील सगळ्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आली. काही देश त्यात समाप्त झाले. यूनान, इजिप्त आणि रोमा सगळे संपले” असं भागवत म्हणाले.

“भारत हे एका अमर समाज, अमर सिविलायजेशनच नाव आहे. बाकी आले, चमकले आणि निघून गेले. या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला आहे. आपण आताही आहोत आणि राहणार. कारण आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यामुळे हिंदू समाज राहणार. हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही. कारण हिंदू समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शन करत असतो. हे आपलं ईश्वर प्रदत्त कर्तव्य आहे” असं मोहन भागवत म्हणाले.

पण तो आवाज दडपू दिला नाही

भागवत म्हणाले की, “प्रत्येक समस्येचा अंत शक्य आहे. त्यांनी नक्षलवादाचं उदहारण दिलं. जेव्हा समाजाने ठरवलं की, हे सहन करायचं नाही, तेव्हा हे संपलं” “ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्याचा अस्त नाही व्हायचा. पण भारतात त्यांच्या सूर्यास्ताची सुरुवात झाली. त्यासाठी आपण 90 वर्ष प्रयत्न केले. 1857 ते 1947. दीर्घकाळ स्वातंत्र्यासाठी आपण लढत होतो. तो आवाज कधी आपण दबू दिला नाही. कधी आवाज कमी झाला, कधी वाढला. पण तो आवाज दडपू दिला नाही” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

आपलं लक्ष्य काय पाहिजे?

मोहन भागवत यांनी आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर भर दिला. देशाने कधी कोणावर अवलंबून राहू नये. “आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही डिपेंडेंट असता कामा नये. आपल्याकडे इकोनॉमिक एबिलिटी, मिलिट्री एबिलिटी आणि नॉलेज एबिलिटी असली पाहिजे. ती वाढली पाहिजे. देश सुरक्षित, समृद्ध राहिला पाहिजे. कुठलाही नागरिक दु:खी, दरिद्री आणि बेरोजगार राहू नये हे आपलं लक्ष्य पाहिजे. सगळ्यांनी देशासाठी काम करुन आनंदात रहावं” असं मोहन भागवत म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!