बजेट २ लाख आणि कमाई १ कोटी… ३ वर्षे चित्रपटगृहात चालला हा सिनेमा, ३२ वर्षांपर्यंत या ब्लॉकबस्टरचा रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नव्हते
एक काळ असा होता जेव्हा वर्षानुवर्षे चित्रपट थिएटरमध्ये असायचे. चित्रपटांचे बजेट अगदी कमी असायचे पण त्यांची कमाई ही दहापट असायची. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याचा रेकॉर्ड 32 वर्षे कुणी मोडू शकले नाही.

एक काळ असा होता जेव्हा चित्रपटांच्या कथा या साधारण सारख्या असायच्या. पण त्या काळातही काही चित्रपट असे आले ज्यांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नव्हते. असाच एक चित्रपट होता ज्याने आपल्या वेगळ्या आणि दमदार कथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटातील इमोशन, ड्रामा आणि नवीन अंदाज असा होता, जो लोकांनी यापूर्वी क्वचितच पाहिला होता. हेच कारण होते की प्रेक्षक चित्रपटगृहाकडे खेचले गेले. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हा चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, परंतु याच्या कमाईने सर्वांनाच थक्क केले. त्या काळात करोडो रुपयांची कमाई करणे हे एखाद्या मोठ्या स्वप्नापेक्षा कमी मानले जात नव्हते.

विशेष बाब म्हणजे, मजबूत कथा हीच खरी ताकद असते हे या चित्रपटाने सिद्ध केले. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अशोक कुमार मुख्य भूमिकेत दिसले होते आणि त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज (मुमताज शांती) झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती ‘बॉम्बे टॉकीज’ने केली होती आणि याचे दिग्दर्शन ज्ञान मुखर्जी यांनी केले होते. हा चित्रपट अवघ्या २ लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, पण याने जवळपास १ कोटी रुपयांची कमाई करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आम्ही येथे १९४३ मध्ये रिलीज झालेल्या ‘किस्मत’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. ‘किस्मत’च्या यशानंतर अशोक कुमार रातोरात मोठे स्टार बनले. असे म्हटले जाते की, या चित्रपटाने त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार बनवले होते. त्या काळात लोक केवळ कथेचेच नाही, तर त्यांच्या अनोख्या शैलीचे आणि अभिनयाचेही वेडे झाले होते. चित्रपटातील त्यांची भूमिका इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळी होती आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडली. चित्रपटगृहांमध्ये लोक शिट्ट्या वाजवायचे आणि टाळ्यांचा कडकडाट दीर्घकाळ ऐकू यायचा.

‘किस्मत’ चित्रपटाची कथा त्या काळाच्या हिशोबाने बरीच धाडसी (Bold) मानली गेली होती. चित्रपटात एका अविवाहित मुलीच्या आई बनण्यासारखा गंभीर विषय दाखवण्यात आला होता, ज्यामुळे याची खूप चर्चा झाली. काही लोकांनी यावर टीकाही केली, पण प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. या चित्रपटातील ‘दूर हटो दुनियावालों हिन्दुस्तान हमारा है’ हे देशभक्तीपर गीतही प्रचंड हिट ठरले. हे गाणे त्या काळात लोकांच्या तोंडी रुळले होते. विशेष म्हणजे आजही हा चित्रपट आदराने लक्षात ठेवला जातो.

या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावता येऊ शकतो की, ‘किस्मत’ कोलकात्याच्या ‘रॉक्सी सिनेमा’मध्ये सलग १८७ आठवडे म्हणजेच साडेतीन वर्षे चालत राहिला होता. त्या काळातील हा स्वतःमध्येच एक खूप मोठा रेकॉर्ड होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा रेकॉर्ड पुढील जवळपास ३२ वर्षांपर्यंत दुसरा कोणताही चित्रपट तोडू शकला नव्हता. नंतर या चित्रपटाची लोकप्रियता पाहून तो तमिळ आणि तेलगू भाषेतही बनवला गेला. आज ८० वर्षे उलटून गेल्यानंतरही ‘किस्मत’ चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक मानले जाते.