माधुरीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे प्रत्येकजण पावसाळ्यात ऐकतो, अनेक वर्षांनंतर देखील गाण्याची क्रेझ कायम
32 वर्षांपूर्वीचं 4 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक आणि लोकप्रिय गाणं, ज्याने प्रदर्शित होताच बदलेला भारतीच चित्रपटांचा इतिहास. अनेक पिढ्यांनंतर पावसाळ्यात प्रत्येकजण हे गाणं ऐकतो.

90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांची जादू आजही कायम आहे. त्या काळातील संगीत, अर्थपूर्ण गाणं आणि भावस्पर्शी सादरीकरणामुळे अनेक गाणी आजही नव्या पिढीची आवडती ठरली आहेत.

अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ये मौसम का जादू है मितवा’, जे आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन..!’ या सुपरहिट चित्रपटातील हे गाणे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायले आहे.

हे गाणे त्या काळातील लोकप्रिय जोडी सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हिरवाईने नटलेले निसर्गरम्य सीन, दोघांमधील सुंदर केमिस्ट्री आणि गाण्याची मधुर चाल यामुळे हे गाणं आजही तितकेच ताजे वाटते.

प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे रेडिओ आणि दूरदर्शनवर दीर्घकाळ लोकप्रिय राहिले. डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, यूट्यूबवरील राजश्रीच्या अधिकृत चॅनेलवर या गाण्याच्या दोन व्हिडिओंना मिळून 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यावरून आजची तरुण पिढीदेखील हे गाणे तितक्याच आवडीने ऐकत असल्याचे दिसून येते. विशेषतः पावसाळ्यात हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळते.