
आचार्य चाणक्य यांनी दैनंदिन आयुष्यात कसे जगावे, कसे राहावे याबाबतही बरेच सल्ले दिलेले आहेत. आचार्य चाणक्य यांनी काही सवयी बदलण्यास सांगितले आहे. या सवयी न बदलल्यास तुम्हाला मेहनत करूनही सन्मान मिळणार नाही.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार स्वत:ला किंमत द्या. तुम्ही स्वत:ला किंमत न दिल्यास लोकदेखील तुम्हाला किंमत देणार नाहीत. तुम्ही नेहमी स्वत:ला कमजोर समजत असाल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेणार नाहीत.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्या वेळेचा, मेहनतीचा, निर्णयांचा आदर केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार योग्य बोलण्याने माणसाची किंमत केली जाते. त्यामुळे तुम्ही एखादे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करा. तरच लोक तुम्हाा आदर देतात.

तुम्ही समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून त्याच्या मताशी नेहमी सहमत होत असाल तर ते चूक आहे. तुमचे मत तुम्ही कोणालाही सांगत नसाल, समोरच्या व्यक्तीची तुम्ही चूक सांगत नसाल तर तुम्हाला मिळणारा मान भविष्यात कमी होईल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.