Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात..
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात आज काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. काल राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. बिहार समु्द्रसपाटीपासून 1.5 किलो मीटर उंचीवर तसेच गुजरात आणि परिसरात 3.1 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. नांदेड, लातूर, धाराशिव, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम राहिल. 20 जुलैनंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आज अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. आजही पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे. काल मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. रात्रीही काही जिल्ह्यात पावसाची नोंद झाली.
यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. पावसाअभावी शेतात टाकलेले पऱ्हे धान पीक नर्सरी करपण्याच्या मार्गावर आहेत.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज आहे. मात्र, शेतकरी राजा चिंतेत असल्याचे बघायला मिळतंय. जर पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात कोसळला नाही तर दुबार पेरणीचे मोठे संकट हे शेतकऱ्यांवर असणार आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिली असताना, जुलैच्या पंधरवड्यातही राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही.
मध्य महाराष्ट्रातील काही भागात, तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात जुलैमधील सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली असून तेथे पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे निम्मा महाराष्ट्र दुष्काळसदृश स्थितीच्या सावटाखाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. बहुतांश भागात 20 ते 60 टक्क्यांदरम्यान पावसाची तूट असल्याचे दिसत आहे. सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज असला तरीही सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. मोसमी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे
