AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात..

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात आज काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 17, 2026 | 7:17 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. काल राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. बिहार समु्द्रसपाटीपासून 1.5 किलो मीटर उंचीवर तसेच गुजरात आणि परिसरात 3.1 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. नांदेड, लातूर, धाराशिव, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम राहिल. 20 जुलैनंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आज अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. आजही पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे. काल मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. रात्रीही काही जिल्ह्यात पावसाची नोंद झाली.

यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. पावसाअभावी शेतात टाकलेले पऱ्हे धान पीक नर्सरी करपण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज आहे. मात्र, शेतकरी राजा चिंतेत असल्याचे बघायला मिळतंय. जर पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात कोसळला नाही तर दुबार पेरणीचे मोठे संकट हे शेतकऱ्यांवर असणार आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिली असताना, जुलैच्या पंधरवड्यातही राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही.

मध्य महाराष्ट्रातील काही भागात, तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात जुलैमधील सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली असून तेथे पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे निम्मा महाराष्ट्र दुष्काळसदृश स्थितीच्या सावटाखाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. बहुतांश भागात 20 ते 60 टक्क्यांदरम्यान पावसाची तूट असल्याचे दिसत आहे. सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज असला तरीही सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. मोसमी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे

Follow Us
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश