Maharashtra News LIVE : बोगस बियाणे व खतांसंदर्भात सरकार ॲक्शन मोडवर, तक्रार निवारण समिती गठित
Maharashtra News LIVE Updates In Marathi : गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ नऊ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती मात्र रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. देश-विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे वाचण्यासाठी दिवसभर पॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग..

LIVE NEWS & UPDATES
-
ओडिशा – पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात 100 हून अधिक जखमी झाले तर दोन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. रथयात्रेत 10 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते.
-
मनसेच्या मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची सकाळी होणार बैठक
मनसेच्या मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची सकाळी बैठक पार पडणार आहे. शिवतीऱथ येथे आज सकाळी 10 वाजता ही महत्वाची बैठक होणार असून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
-
-
गोंदिया – शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या मुलीवर कुत्र्यांचा हल्ला, मुलगी जखमी
गोंदिया शहरात बेवारस मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सकाळी, शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून तिला जखमी केले. मोकाट कुत्र्यांची दहशत शहरात पसरली आहे.
-
नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर सुरूच
नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वापरण्यात येत आहे. जिल्ह्यात सव्वादोन लाखांहून अधिक नागरिक अजूनही टंचाईग्रस्त आहेत. मुसळधार पावसानंतर नाशिकच्या पश्चिम भाग म्हणजे इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि कळवण तालुके टँकरमुक्त झाले. मात्र पूर्व भागात अध्याप 70 हुन अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येवला, नांदगाव आणि सिन्नर तालुक्यांत अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
-
खासदार पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्षा निवासस्थानी पार्थ पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटले. दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेत सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता पार्थ पवार हेही मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले.
-
-
तीन दिवस पुराच्या पाण्यात अडकलेल्या ‘टॉमी’ची थरारक सुटका
मावळ तालुक्यातील भांगरवाडी येथे पुराच्या पाण्यात तीन दिवस घराच्या पत्र्यावर अडकलेल्या ‘टॉमी’ या पाळीव कुत्र्याची शिवदुर्ग रेस्क्यू टीमने जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली. या बचाव मोहिमेदरम्यान टीमलाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.
भांगरवाडीतील कालेकर यांच्या घरामागे पुराच्या पाण्यामुळे ‘टॉमी’ हा कुत्रा तीन दिवस पत्र्यावर अडकून पडला होता. पावसात भिजत तो सतत मदतीसाठी ओरडत होता. अखेर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
-
आईच्या कुशीतून ६ महिन्यांचा मुलगा गायब, कल्याण स्टेशनबाहेरील अपहरणाने खळबळ
आईच्या कुशीतून ६ महिन्यांचा मुलगा गायब झाल्याचे उघड झाले. कल्याण स्टेशनबाहेरील थरारक अपहरणाने खळबळ माजली आहे. दादरा नगर हवेली येथून आलेल्या महिलेला कल्याण कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाखाली झोप लागली. तेव्हाच चोरट्यांनी बाळाचे अपहरण केलं एवढंच नव्हे तर त्या महिलेचा मोबाईल फोनही लंपास केला. पहाटे जाग आल्यानंतर बाळ बेपत्ता असल्याचे लक्षात येताच आईने आक्रोश केला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकल्या शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके सक्रिय झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
-
-
विठुराया, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री कर ! केडीएमसीच्या नगरसेवकाने घातलं साकडं
विठुराया, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री कर.. असं साकडं आषाढी वारीत कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी घआतल्याचं समोर आलं. कुणाल पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
बोनस बियाणे व खते या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. 29 जून 2025 रोजी स्थापन केलेली पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त करण्यात आली आहे. बोगस बियाणांच्या तक्रारी पाहता, पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन त्यांची तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. अर्नाळा येथील समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा शोध अद्यापही सुरूच आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर, अर्नाळा पोलीस , वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून मागच्या 20 तासांपासून शोधमोहिम सुरू आहे. – नंदुरबार जिल्ह्यात दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर पेरणी केली; मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने उगवलेली पिके धोक्यात सापडली आहेत. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेटस या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
Published On - Jul 17,2026 8:03 AM
