Asaduddin Owaisi : भारतानं ट्रॉफी नाकारली, ओवेसींना राग अनावर, पाकिस्तानला झापलं अन् टीम इंडियाबाबतही मोठं विधान
Asaduddin Owaisi On BCCI : महिला आशिया कप 2026च्या ट्रॉफीवरून निर्माण झालेल्या वादानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर सवाल उपस्थित केले आहेत.

महिला आशिया चषक 2026 च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार आणि BCCI वर जोरदार टीका केली आहे.
"दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध सामने कशासाठी खेळता?" असा सवाल ओवैसींनी केला. तसेच केवळ टीव्ही प्रसारणाच्या हक्कांतून पैसे कमवण्यासाठी BCCI देशातील नागरिकांना मूर्ख बनवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते एएनआयशी बोलत होते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि गृहमंत्री असलेल्या मोहसीन नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे भारतीय महिला संघाने अधिकृत सोहळ्यात सहभाग न घेता मैदानावरच चषकाशिवाय विजयोत्सव साजरा केला.
पाकिस्तान आजही दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे सांगत ओवैसी यांनी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा आठवण करुन दिली. "क्रिकेट खेळलो नाही तर आकाश कोसळणार नाही," असे म्हणत त्यांनी पाकिस्तानसोबतचे सर्व क्रीडा संबंध तोडण्याची भूमिका मांडली.
राजकीय व सुरक्षेच्या पार्श्वभूमीमुळे आणि बोर्डाच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे BCCI सचिव देवजित सैकिया व मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी स्पष्ट केले.