
अहमदनगरला शेवगावच्या मच्छिंद्र वावरे यांच्या केळीच्या बागेचं मोठं नुकसान झालं असून बाग भुईसपाट झालीये. तर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे

या तीन तालुक्यांतील सुमारे २५ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहेय. तर अनेक पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.

केळीच्या बागांचं देखील मोठं नुकसान झालंय. कृषी आणि महसूल विभागाच्या पथकांकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचं काम सुरु आहे.

तसेच नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८२.९ मिलीमीटर पावसाची नोंद झालीये. तर वार्षिक सरासरीच्या जिल्ह्यात ८५.४ टक्के पाऊस पडलाय. त्याचबरोबर उर्वरित तालुक्यांत मात्र जास्त पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांना फायदाच झाला आहे.