AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायलटनेच बटन दाबलं अन विमानाचा स्फोट, त्या विमान अपघाताबाबत धक्काकादायक अपडेट; सत्य समोर येताच खळबळ!

या विमान अपघातामागे पायलटचा हात होता, असा दावा केला जातोय. एका वर्तमानपत्रात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

पायलटनेच बटन दाबलं अन विमानाचा स्फोट, त्या विमान अपघाताबाबत धक्काकादायक अपडेट; सत्य समोर येताच खळबळ!
ahmedabad plane crashImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 12, 2026 | 5:49 PM
Share

Ahmedabad Plane Crash : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजितादादांच्या अकाली निधनानंतर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या विमान अपघातानंतर विमान उड्डाणाचे नियम, आणि विमान प्रवासादरम्यानची सुरक्षा हे मुद्दे पुन्हा नव्याने चर्चेला आले. आता हा अपघात नेमका कसा झाला? त्यामागची कारणे काय आहेत? याबाबतचा तपास सुरू झाला आहे. लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असतानाच गेल्या वर्षी झालेल्या अशाच एका प्रवासी विमान अपघाताबाबत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे. या विमान अपघातात पायलटने विमानाचे फ्युल कंट्रोल मुद्दामहून बंद केले होते, असा दावा केला जात आहे.

बोईंग विमान कपंनीला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न

अहमदाबाद येथील 12 जून 2025 रोजी झालेल्या विमान अपघाताबाबत हा दावा करण्यात आला आहे. विमानाने प्रवासासाठीह हवेत झेप घेतल्यानंतर पुढच्या अवघ्या काही सेकंदांत हे विमान कोसळले होते. एअर इंडिया कंपनीच्या या विमानाचे नाव बोईंग 878 ड्रीमलाईनर असे होते. या विमानातील फक्त एक प्रवासी बचावला होता. याच विमान अपघाताबाबत आता मोठा दावा केला जात आहे. इटलीच्या डेली कोरिएरे डेला सेरा या वर्तमानपत्रात हा विमान अपघात का झाला? याचं कारण सांगण्यात आलं आहे. या रिपोर्टमध्ये बोईंग विमान कपंनीला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वैमानिकानेच मुद्दामहून विमानाचे फ्यूल कंट्रोल स्विच बंद केले होते, असा खळबळजनक दावा यात करण्यात आला आहे.

260 जणांचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या या अपघातात एकूण 241 प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये फक्त एकाचा जीव वाचला होता. उर्वरित प्रवासी तसेच क्रू मेंबर्स मिळून एकूण 260 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला होता. सुरुवातीला इंजिनला पोहोचणाऱ्या इंधनाचा पुरवठा थांबल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. विमानाचा अपघात झाल्यानंतर ते थेट एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर जाऊन आदळले होते.

दरम्यान, या विमानाच्या वैमानिकावरच थेट आरोप करण्यात आल्याने आता नव्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे डीजीसीएच्या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.