Bollywood Actress: पन्नाशी उलटली तरी अजूनही सिंगल आहेत या 5 नायिका, एकीने तर सत्तरी ओलांडली
Bollywood Actress Single: बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत एकापाठोपाठ एक लग्नं उरकली जात आहेत.अनेकांनी याच क्षेत्रातील जीवनसाथीदार निवडला आहे.तर दुसरीकडे याच ग्लॅमर इंडस्ट्रीतील काही अभिनेत्री पन्नाशीतही एकट्यानेच दिवस कंठत आहेत. चला तर या पाच अभिनेत्री कोण आहेत ते पाहूयात...

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकावले असले तरी पर्सनल लाईफमध्ये मात्र यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा जोडीदार यांना मिळालेला नाही. आपण बोलत आहोत अशा पाच अभिनेत्रींबद्दल ज्यांनी पन्नाशी ओलांडली तरी अजूनही त्या सिंगल आहेत.

तब्बू - तब्बू बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. आता ती ५४ वर्षांची झाली आहे. मात्र अजूनही तिने लग्न केलेले नाही.इंडस्ट्रीत तिचे अफेअर्स देखील चर्चेत होते. तिने अनेक रोमांटिक भूमिका देखील केल्या. अजूनही ती इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र तरीही तिचा जीवनाचा साथीदार तिला अजूनही सापडलेला नाही.

सुष्मिता सेन - सुष्मिता सेन ही भारताची सौदर्यवती स्पर्धा जिंकून बॉलीवूडमध्ये गाजली. तिने करीयरमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिकाही लिलया केल्या. आजच्या काळातही ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर यश मिळवत आहे. मात्र, पन्नाशी ओलांडूनही ती सिंगलच आहे. तिच्या रिलेशनशिपवरुन मात्र ती चर्चेत असते. अलिकडे तर ललित मोदी यांच्यासोबतही तिचे नाव आले होते.

मनीषा कोईराला - आपल्या अवखळपणा आणि सौदर्यामुळे गाजलेल्या मनिषा कोईराला हीने करीयर चांगले केले. तिने साल २०१० मध्ये लग्न केले होते. मात्र दोन वर्षे ते टिकले. तेव्हापासून ती सिंगल आहे.तिचे वय आता ५५ आहे.

अमीषा पटेल - अमिषा पटेल हीने ऋतिक रोशन सोबत 'कहो ना प्यार है'मधून करियरची जोरदार सुरुवात केली. आता तिचे वय ५० च्या पुढे गेले असले तरी तिचे लग्न झालेले नाही. तिला गदर चित्रपटाने पुन्हा नवीन ओळख मिळाली. मात्र, आता तिचे वय चेहऱ्यावर दिसत असल्याने करियरची गाडीही रखडली आहे.

रेखा - सौदर्यवती रेखा हीने अभिनयात जी कमाल केली आहे ती अजून प्रेक्षक विसरलेले नाहीत. मात्र आता ७१ वयाची झाली असतानाही रेखा एकटीच आहे. रेखाने अनेक विवाह केले होते.अमिताभ बच्चन आणि विनोद मेहरा यांच्याबरोबरचे त्यांचे संबंधही गाजले. मात्र आज त्या एकट्या जीवन जगत आहेत.