
आज बारावीचा निकाल लागला आहे. बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत.

कंगना राणौत या बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना बारावीत नापास झाल्या आहेत. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ जे बारावी नापास झाले आहेत.

कंगना राणौत बारावीत नापास झाल्या आहेत. त्यानंतर अभिनेत्रीने शिक्षण सोडून मॉडेलिंगमध्ये करिअर केले. आज कंगना बॉलिवूडसोबतच राजकारणातही सक्रिय आहे.

काजोलने एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतलं वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने 'बेखुदा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिचा 'बाजीगर' सिनेमा प्रचंड यशस्वी झाला. अभिनयात करिअर करण्यासाठी तिने शाळा सोडली. ती बारावी उत्तीर्णही झालेली नाही.

अर्जुन कपूरही बारावीत नापास झालेला आहे. बारावीत नापास झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडली आणि बॉलिवूडमध्ये काम करायचं ठरवलं.