उंदरांच्या मृत्यूने चित्रपटाची सुरुवात, एक गरोदर स्त्री, हिरो नसलेला हिंदी चित्रपट, बजेट 8 कोटी छापले 100 कोटी पेक्षा जास्त
चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्याआधीच बॉलिवूडमध्ये मोठे स्टार्स आणि बिग बजेटची चर्चा ऐकायला मिळते. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांचं बजेट कमी होतं, पण या चित्रपटांनी मेकर्सची तिजोरी भरली. आज आपण अशाच चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.

वर्ष 2012 मध्ये एक छोट्या बजेटचा चित्रपट आला. ही मिस्ट्री फिल्म होती. पहिल्या सीनपासून रहस्यांनी भरलेला हा चित्रपट होता. अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलेलं. या चित्रपटात काही मिनिटांसाठी अमिताभ बच्चन दिसले होते.

फक्त 8 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन काही मिनिटांसाठी दिसले होते. या चित्रपटाने तब्बल 108 कोटींची कमाई करुन बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिलेली. चित्रपटाची कथा कोलकात्यामधील दाखवण्यात आलेली. तुम्ही या चित्रपटाचं नाव सांगू शकता का?.

हा 2012 साली आलेला चित्रपट 'कहानी' आहे. विद्या बालन या चित्रपटात लीड रोलमध्ये होती. रहस्य मिस्ट्री या चित्रपटाची जान होती. 8 कोटी बजेटच्या या चित्रपटाने 104 कोटींची कमाई करुन भल्या, भल्यांना थक्क करुन सोडलेलं.

विद्या बालनने अशा एक महिलेचा रोल साकारलेला जिने प्रेग्नेंट होण्याचं नाटक केलेलं. सुजॉय घोषने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विद्या बालनच नाव विद्या बागची असतं. दुर्गा पूजनाच्यावेळी ती कोलकात्यात आपल्या पतीला शोधायला येते.

कोलकाता मेट्रोच्या एका डब्ब्यात विषारी गॅस हल्ल्याने कहानी चित्रपटाची सुरुवात होते. 2 वर्षानंतर एक प्रेग्नेंट सॉफ्टवेयर इंजीनियर विद्या बागची (विद्या बालन) तिचा बेपत्ता नवरा अर्णब बागचीचा शोध घेत दुर्गा पूजा उत्सवा दरम्यान लंडनहून कोलकात्याला येते.