हे डबल मीनिंग गाणं ऐकून चाहते सोडा सेंसर बोर्ड देखील हादरलं होतं, पण प्रेक्षकांना आवडलं अन् ठरलं सुपरहिट

हिंदी चित्रपट हे गाण्याशिवाय कधीच पूर्ण होत नाहीत. मात्र, काही चित्रपटांमधील गाण्यांचे बोल इतके विचित्र असतात की ते वादग्रस्त ठरतात. असच एक डबल मीनिंग गाणं जे ऐकून सेंसर बोर्ड देखील हादरलं.

| Updated on: Apr 14, 2026 | 3:29 PM
1 / 5
1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आली, ज्यांनी प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला. मात्र काही गाणी अशीही होती, ज्यांनी लोकप्रियतेसोबतच वादही ओढवून घेतले.

1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आली, ज्यांनी प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला. मात्र काही गाणी अशीही होती, ज्यांनी लोकप्रियतेसोबतच वादही ओढवून घेतले.

2 / 5
आज आपण अशाच एका गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने रिलीज होताच खळबळ उडवली होती आणि सेन्सॉर बोर्डालाही नाराजी व्यक्त करायला लावली होती.

आज आपण अशाच एका गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने रिलीज होताच खळबळ उडवली होती आणि सेन्सॉर बोर्डालाही नाराजी व्यक्त करायला लावली होती.

3 / 5
आपण बोलत आहोत 1994 साली प्रदर्शित झालेल्या अंदाज या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘खड़ा है’ बद्दल. या गाण्यात अनिल कपूर आणि जूही चावला यांची जोडी पाहायला मिळाली होती. गाण्याचे बोल आणि त्यातील काही शब्दांमुळे त्या काळात मोठा वाद निर्माण झाला होता.

आपण बोलत आहोत 1994 साली प्रदर्शित झालेल्या अंदाज या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘खड़ा है’ बद्दल. या गाण्यात अनिल कपूर आणि जूही चावला यांची जोडी पाहायला मिळाली होती. गाण्याचे बोल आणि त्यातील काही शब्दांमुळे त्या काळात मोठा वाद निर्माण झाला होता.

4 / 5
हे गाणं विनोद राठोड आणि साधना सरगम यांनी गायले होते, तर त्याला संगीत बप्पी लाहिरी यांनी दिलं होतं. गाण्याचे शब्द काहींना आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्यावर टीका झाली आणि सेन्सॉर बोर्डाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. तरीही, प्रेक्षकांनी या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आणि ते सुपरहिट ठरले.

हे गाणं विनोद राठोड आणि साधना सरगम यांनी गायले होते, तर त्याला संगीत बप्पी लाहिरी यांनी दिलं होतं. गाण्याचे शब्द काहींना आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्यावर टीका झाली आणि सेन्सॉर बोर्डाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. तरीही, प्रेक्षकांनी या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आणि ते सुपरहिट ठरले.

5 / 5
गाण्याच्या शूटिंगदरम्यानही काही अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला जूही चावलाने या गाण्याच्या चित्रिकरणाबाबत आक्षेप घेतल्याची चर्चा होती, मात्र नंतर त्यांनी ते पूर्ण केलं. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र ते रातोरात चर्चेत आलं आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं.

गाण्याच्या शूटिंगदरम्यानही काही अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला जूही चावलाने या गाण्याच्या चित्रिकरणाबाबत आक्षेप घेतल्याची चर्चा होती, मात्र नंतर त्यांनी ते पूर्ण केलं. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र ते रातोरात चर्चेत आलं आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं.

Follow Us