
आपण आपल्या घरामध्येच बघितले असेल की, अत्यंत छोट्या गोष्टींवरून महिला लगेचच डोळ्यांमधून पाणी आणतात. बऱ्याच वेळा हे बघितल्यानंतर अनेकांची चिडचिड देखील होते. मात्र, या महिल्यांबद्दल चाणाक्य म्हणतात की, या महिला खरोखरच मनाने मऊ असतात आणि कुटुंबासाठी चांगल्या असतात.

चाणाक्य म्हणतात की, ज्या महिला लगेचच रडतात, त्या कधीही आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर होत नाहीत. अशा महिला आपल्या पतीशी खूप प्रामाणिक असतात आणि सर्व दुःख सहन करूनही त्यांच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार असतात.

ज्या महिला लगेचच रडण्यास सुरूवात करतात, त्या मनाने खूपच जास्त हळव्या असतात. मनात सर्वांबद्दल प्रेमाची भावना आहे. अशा महिलांना कुटुंब एकत्र ठेवायला आवडते. त्यांची नेहमी काळजी घेतली पाहिजे.

ज्या महिला छोट्या गोष्टींवर रडतात. त्यांना लगेचच कोणालाही दुखवायचे नसते. त्या आयुष्यभर सर्वांची मने जपण्याच्या प्रयत्न करतात. विशेष म्हणजे या कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सर्वकाही सहन देखील करतात.

महिलांसाठी रडणे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते. कारण महिलांना त्यांच्या समस्या लवकर सांगता येत नाहीत. रडण्याने त्यांचे मन हलके होते आणि त्यांचा ताण कमी होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे घरातील वातावरणही चांगले राहण्यास मदत होते.