
आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.