
मुंबई | 31 जानेवारी 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने श्री श्री रवीशंकर यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तरूणाईच्या मनातील प्रश्न प्राजक्ताने श्री श्री रवीशंकर यांना विचारला आहे.

आम्ही कलाकार आहोत. तर शुक्राचा प्रभाव आहे. पण आतला साधक म्हणतो की, मोहमायापासून दूर राहा. तर शुक्र कलेकडे खेचतोय. तर गुरु दुसरीकडे अशा वेळी काय करावं, असा प्रश्न प्राजक्ताने श्री श्री रवीशंकर यांना विचारला.

अध्यात्माला निरस करू नये. या दोघांना एकत्र घेऊल चाललं पाहिजे. दोन्हीचा मध्य साधला पाहिजे, असं श्री श्री रवीशंकर यांनी सांगितलं.

सध्या सगळ्यांमध्ये इन्सिक्युरिटी आहे. कलाकारांमध्ये ती जास्त आहे. कलाकार प्रेक्षकांशी जोडलेला असतो. पण तरिही कलाकार एकटं फिल करतो. जीवन जगताना कलाकाराचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, असा प्रश्न प्राजक्ता माळीने विचारला.

कलाकार नेहमी कृत्रिम हसू घेऊन वावरत असतात. सगळ्यांना खुश करण्याच्या नादात कलाकार स्वत:कडे लक्ष द्यायला विसरतो. पण माणसाने नऊ रसांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे, असं श्री श्री रवीशंकर यावेळी म्हणाले.