नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

| Updated on: Aug 16, 2021 | 3:50 PM

काही जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या जुन्या मालिकांच्या जागी आता काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकांसह प्रेक्षकांना नव्या जोड्या देखील पाहायला मिळणार आहेत. या नव्या जोड्या आता प्रेक्षकांचं किती मनोरंजन करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

1 / 5
काही जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या जुन्या मालिकांच्या जागी आता काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकांसह प्रेक्षकांना नव्या जोड्या देखील पाहायला मिळणार आहेत. या नव्या जोड्या आता प्रेक्षकांचं किती मनोरंजन करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

काही जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या जुन्या मालिकांच्या जागी आता काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकांसह प्रेक्षकांना नव्या जोड्या देखील पाहायला मिळणार आहेत. या नव्या जोड्या आता प्रेक्षकांचं किती मनोरंजन करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

2 / 5
‘अल्फा मराठी’ आणि ‘झी मराठी’वरील ‘आभाळमाया’, ‘अवंतिका’ दूरदर्शनवरील ‘दामिनी’ या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून, एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

‘अल्फा मराठी’ आणि ‘झी मराठी’वरील ‘आभाळमाया’, ‘अवंतिका’ दूरदर्शनवरील ‘दामिनी’ या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून, एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

3 / 5
आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे. मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना  भेटणार आहेत.

आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे. मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.

4 / 5
एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मालिकेचं नाव ‘ती परत आलीये’ असं आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. तर, अभिनेता श्रेयस राजे आणि अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मालिकेचं नाव ‘ती परत आलीये’ असं आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. तर, अभिनेता श्रेयस राजे आणि अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

5 / 5
झी मराठीवर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘मन उडू उडू झालं’ असं या मालिकेचं नाव असून, ही मालिका 30 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

झी मराठीवर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘मन उडू उडू झालं’ असं या मालिकेचं नाव असून, ही मालिका 30 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.