AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील या गावात स्मशानभूमीच नाही; भर पावसात ताडपत्री धरून करावे लागतायत अंत्यविधी

प्रत्येक गावाता एक तरी स्मशानभूमी असायलाच हवी, पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे, जेथे स्मशानभूमीच नाही. भर पावसात ताडपत्री धरुन अंत्यविधी करायला लागतात, तर जाणून कोणतं आहे ते गाव आणि कशी आहे तेथील परिस्थिती...

महाराष्ट्रातील या गावात स्मशानभूमीच नाही; भर पावसात ताडपत्री धरून करावे लागतायत अंत्यविधी
Shahapur
| Updated on: Aug 12, 2026 | 1:00 PM
Share

ठाणे येथील आदिवासी वसाहत असलेल्या शहापूर येथील उंभरई गावातील एक हृदयद्रावक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये दिसतंय की, अंत्यसंस्कार उंभरई गावात होत आहेत. पण तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ग्राम पंचायत समितीच्या सदस्या जयाबाई महादू वाघ यांचं निधन झालं. अशात गावात स्मशान नसल्यामुळे त्यांच्यावर मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळत होता, अशात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत असल्यामुळे गावकऱ्यांनी ताडपत्रीचा उपयोग करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, जयाबाई महादू वाघ यांचं आजाराने निधन झालं. पण स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांच्यावर एका मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयाबाई महादू वाघ यांच्यावर एका मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर चिता जळण्यास अनेक समस्या येऊ लागल्या. तेव्हा गावकरी ताडपत्री घेऊन उभे राहिले. पाऊसाचं पाणी मृतदेहावर पडू नये आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी ताडपत्रीच्या सहाय्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांची तक्रार आहे की, त्यांच्या उंभरई गावात एकही स्मशानभूमी नाही. गेल्या 2 वर्षांपासून गावकरी प्रशासनाकडे स्मशानभूमीची मागणी करत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी शहापूरचे तत्कालीन तहसीलदार परमेश्वर काळुसे यांनी स्मशानभूमीसाठी गावातील एका जागेची पाहणी केली होती. त्यावेळी स्मशानभूमीचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असं आश्वासन देण्यात आले होते; मात्र, ग्रामस्थांच्या मते हा प्रश्न आजही प्रलंबित आहे.

एकीकडे शहापूरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे अनेक आदिवासी वस्त्या रस्ते, पाणी, वीज, आरोग्यसेवा आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करत आहेत. जयाबाई महादू वाघ यांच्या अंत्यसंस्काराचे दृश्य प्रशासन आणि राजकीय नेत्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण करते. गावकऱ्यांची मागणी आहे की, स्मशानभूमीसोबतच पक्क रस्ते आणि अन्य सुविधा देखील उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?