अखेर भारतात ते संकट आलंच? CNG बाबत सर्वात मोठा निर्णय; 48 तासांतच…
पश्चिम आशियातील युद्धामुळे जगावर उर्जेचं संकट निर्माण झालं आहे. भारतातही पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढत आहे. असे असतानाच आता तेल विपणन कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. भारतातही नैसर्गिक वायू, पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत वाढली आहे. अलिकडेच पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यात आला होता.

शुक्रवारी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी यांच्या भाववाढीचा 15 मे रोजी निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकादा तेल विपणन कंपन्यांनी सीएनजीचा भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनजीमध्ये दोन दिवसांत ही सलग दुसरी भाववाढ आहे. भाववाढ झालेली असली तरी भारतीयांसाठी एक दिलासा म्हणजे ही भाववाढ फक्त राजधानी दिल्लीपुरतीच मर्यादित आहे. तेल विपणन कंपन्यांनी दिल्लीमध्ये सीएनजीचा भाव एक रुपया प्रति किलोने वाढवला आहे.

नव्या भाववाढीनंतर दिल्लीमध्ये सीएनजी 80.9 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 88.70 रुपये प्रति किलोवर गेली आहे. याआधी 15 मे रोज सीएनजीचा भाव 2 रुपये प्रति किलोने वाढला होता.

शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढला होता. पेट्रोलचा भाव 3.14 रुपये प्रति लिटरने वाढून दिल्लीमध्ये 97.77 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर दुसरीकडे डिझेलचा भावदेखील 3.11 रुपयांनी वाढून 90.67 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला होता. ही सर्व स्थिती लक्षात घेता देश इंधनाच्या संकटात तर सापडलेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.