
तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर अनेक अडचणी येऊ शकतात. हाच कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करता येऊ शकतो.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू या ग्रहांच्या मध्ये इतर सर्व ग्रह येतात. त्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, असे म्हटले जाते. राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हटले जाते.

कुंडलीत कालसर्प दोष असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात अडथळे निर्माण होतात. तसेच तणावग्रस्त आयुष्य बनते. कौटुंबिक समस्यांचाही सामना करावा लागतो. विशेष म्हणजे आर्थिक अडचणही येऊ शकते.

मात्र कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. त्यासाठी गोमेद रत्न फारच प्रभावी ठरू शकते. गोमेद रत्न हे राहू ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळेच या गोमेद रत्नाला विशेष महत्त्व आहे.

गोमेद रत्न राहूच्या प्रभावाला कमी करते, असे सांगितले जाते. गोमेद रत्नामुळे व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच साहस आणि मानसिक स्थैर्य येते. जेव्हा कुंडलीत कालसर्प दोष असतो तेव्हा हे रत्न तुमच्या अडचणी दूर करू शकते, असे म्हटले जाते.

मात्र गोमेद रत्न धारण करण्याआधी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. हे रत्न सामान्यत: वृषभ, मिथून, कन्या, तुळ, कुंभ राशींसाठी चांगले मानले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.