
भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच वर्षांपासूनचं शत्रूत्त्व आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्ध झालेले आहे. विशेष म्हणजे अनेकवेळे नाचक्की होऊनही पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करतच असतो. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक मोठे प्रश्न आहेत.

गरिबी, भूकबळी कमी करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतो. पाकिस्तान कर्जात बुडालेला आहे. परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अनेकदा कर्ज दिलेले आहे. तरीदेखील पाकिस्तानतील परिस्थिती अद्याप बदललेली नाही.

असे असतानाच आता भारताने पाकिस्तानला कर्च दिलेले आहे का? असे विचारले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानने याआधी पाकिस्तावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. पाकिस्तानातील भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाची नाणेनिधीने टीका केलेली आहे.

असे असूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.29 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे. असे असतानाच भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही.

भारत पाकिस्तानला आर्थिक मदत केलेली नाही. भारताने पाकिस्तनला कोणतीही कर्ज दिलेले नाही. दरम्यान, पाकिस्तान आपली स्थिती बदलावी, विकास व्हावा, कर्ज कमी व्हावे यासाठई प्रयत्न करतो. परंतु अद्याप या देशाला त्यात फारशे यश मिळालेले नाही.