उन्हामुळे देशभरात मृत्यू, सरकारने तडकाफडकी ते पाऊल उचललंच, आता नागरिकांना…

सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघातच्या प्रकरणांतही लक्षणीयरित्या वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

| Updated on: Apr 27, 2026 | 8:51 PM
1 / 5
सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उन्हाचा चटका वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यामुळेच लोकांना उष्माघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उन्हाचा चटका वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यामुळेच लोकांना उष्माघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

2 / 5

उष्माघातामुळे अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. भर उन्हात घराच्या बाहेर पडल्यामुळे तसेच योग्य ती काळजी न घेतल्याने हे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळेच आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

3 / 5

लोकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. लोकांनी उन्हामध्ये नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत या सूचनांमध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

4 / 5

या सूचनांनुसार स्वत:चे उन्हापासून तसेच गरमीपासून संरक्षण करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. द्रव रुपातील पदार्थ खा. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी हलके आणि आरामदायी कपडे परिधान करावेत.

5 / 5

यासह दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत उन्हात घराबाहेर निघू नये. घराबाहेर पडू नये. तसेच मद्य, चहा, कॉफी पिणे टाळावे. उन्हाच्या काळात व्यायाम करणे टाळावे. कडक उन्हात जास्त श्रम करू नये, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us