डोकं दुखत असेल तर काय करावं? जराही दुर्लक्ष न करता हे उपाय करा
जर डोकेदुखी वारंवार होऊ लागली, तर तो केवळ एक साधा त्रास नसून तुमच्या शरीरात काही तरी चुकीचे घडते असल्याचे संकेत असतात. डोके दुखी सुरु झाल्यावर काय करावं जाणून घ्या...

जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल, तर तुम्ही याकडे अनेकदा दुर्लक्ष केले असेल. कधी कामाचा ताण, कधी जास्त स्क्रीन टाइम, तर कधी झोपेची कमतरता यामुळे डोके दुखी होते. कधीकधी तर एक पेनकिलर घेऊन विषय संपवला जातो. पण जेव्हा डोकेदुखी वारंवार सुरू होते, तेव्हा ही फक्त साधी समस्या नसते, तर शरीर तुम्हाला काहीतरी गडबड असल्याचे संकेत देत असते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अॅन्ड स्ट्रोकच्या मते, डोकेदुखीला अनेक कारणे असू शकतात. यात ताण-तणाव, पाण्याची कमतरता, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांचा समावेश आहे. सर्वात सामान्य कारण म्हणजे ताण (स्ट्रेस). कामाचा दबाव, जबाबदाऱ्या आणि सतत मनात घोळणाऱ्या चिंता यामुळे मान, खांदे आणि जबड्याच्या स्नायूंना ताण येतो, जो हळूहळू डोकेदुखीमध्ये रूपांतरित होतो. असा दुखणे बहुतेकदा डोक्याभोवती दाब किंवा जडपणा जाणवतो.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेसे पाणी न पिणे. अनेक लोक दिवसभरात पुरेसे पाणी पित नाहीत आणि चहा-कॉफीवरच समाधान मानतात. शरीराला पाण्याची कमतरता झाल्यास डोकेदुखी, जडपणा आणि सुस्ती जाणवते, जी विशेषतः दुपारी वाढते.

आजच्या काळात मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा जास्त वापर हे डोकेदुखीचे एक प्रमुख कारण बनले आहे. दीर्घकाळ स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि डोळ्यांच्या मागे किंवा कपाळात दुखणे सुरू होते.

अपूरी किंवा खराब झोप देखील डोकेदुखी वाढवते. फक्त झोपेच्या तासांनाच नव्हे, तर झोपेच्या गुणवत्तेलाही महत्त्व आहे. रात्री वारंवार जाग येणे किंवा मोबाइल वापरणे यामुळे सकाळी उठताच डोके जड वाटू शकते.

जेवण वेळेवर न घेणे किंवा जेवण सोडणे देखील डोकेदुखीचे कारण ठरू शकते. दीर्घकाळ उपाशी राहिल्यास ब्लड शुगर कमी होते, ज्यामुळे डोकेदुखी, कमजोरी आणि चक्कर येऊ शकतात.

सतत होणारी डोकेदुखी हलकी समजू नका. आपल्या दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्या. कधी दुखते, कशामुळे वाढते आणि कशाने कमी होते. पुरेसे पाणी पिणे, वेळेवर झोपणे, स्क्रीन ब्रेक घेणे आणि ताण कमी करणे यासारखे छोटे बदल डोकेदुखीची समस्या बरीच कमी करू शकतात.