GK : ही आहे भारतातील सर्वात लहान नदी, लांबी फक्त…

Smallest River : भारतात असंख्य नद्या आहेत. यातील काही नद्या आपल्या विशाल लांबीसाठी तर काही नद्या धार्मिक महत्त्वासाठी ओळखल्या जातात. मात्र आज आपण देशातील एका लहान नदीची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Apr 07, 2026 | 9:07 PM
1 / 5
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एक अशी नदी वाहते, जिची लांबी फक्त 45 किलोमीटर आहे. मात्र तिची कहाणी मोठ्या नद्यांपेक्षाही अधिक प्रेरणादायी आहे. या नदीचे नाव अरवरी नदी आहे, जिला भारतातील सर्वात छोटी नदी म्हटले जाते.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एक अशी नदी वाहते, जिची लांबी फक्त 45 किलोमीटर आहे. मात्र तिची कहाणी मोठ्या नद्यांपेक्षाही अधिक प्रेरणादायी आहे. या नदीचे नाव अरवरी नदी आहे, जिला भारतातील सर्वात छोटी नदी म्हटले जाते.

2 / 5
अरवरी नदी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भानेटा गावातून उगम पावते. प्राचीन अरावली पर्वतरांगांमधून सुरू होणारी ही नदी राजस्थानच्या कोरड्या प्रदेशातून वाहत जाऊन शेवटी अलवरमधील सरस गावाजवळ साहिबी (साई) नदीला मिळते.

अरवरी नदी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भानेटा गावातून उगम पावते. प्राचीन अरावली पर्वतरांगांमधून सुरू होणारी ही नदी राजस्थानच्या कोरड्या प्रदेशातून वाहत जाऊन शेवटी अलवरमधील सरस गावाजवळ साहिबी (साई) नदीला मिळते.

3 / 5
एक काळ असा होता की अरवरी नदी पूर्णपणे आटली होती. बेछूट वृक्षतोड आणि भूजलाचा अतिवापर यामुळे जवळपास सहा दशके ही नदी अस्तित्वात नव्हती. अरवरी नदी आटणे हे राजस्थानमधील जलसंकटाचे गंभीर प्रतीक बनले होते.

एक काळ असा होता की अरवरी नदी पूर्णपणे आटली होती. बेछूट वृक्षतोड आणि भूजलाचा अतिवापर यामुळे जवळपास सहा दशके ही नदी अस्तित्वात नव्हती. अरवरी नदी आटणे हे राजस्थानमधील जलसंकटाचे गंभीर प्रतीक बनले होते.

4 / 5
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलली, जेव्हा तरुण भारत संघ (NGO) आणि स्थानिक ग्रामस्थांनी हार मानली नाही. त्यांनी पारंपरिक जलसंधारण पद्धतींचा अवलंब केला. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमातून मातीचे छोटे-छोटे बंधारे बांधायला सुरुवात केली, ज्यांना स्थानिक भाषेत ‘जोहड’ म्हणतात.

1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलली, जेव्हा तरुण भारत संघ (NGO) आणि स्थानिक ग्रामस्थांनी हार मानली नाही. त्यांनी पारंपरिक जलसंधारण पद्धतींचा अवलंब केला. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमातून मातीचे छोटे-छोटे बंधारे बांधायला सुरुवात केली, ज्यांना स्थानिक भाषेत ‘जोहड’ म्हणतात.

5 / 5
या मातीच्या छोट्या बंधाऱ्यांचा उद्देश पावसाचे पाणी अडवणे होता, जेणेकरून ते वाहून जाऊन वाया न जाता जमिनीत मुरेल. हळूहळू या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला. भूजल पातळी वाढली आणि दशकांच्या शांततेनंतर अरवरी नदी पुन्हा वाहू लागली. आज ही नदी राजस्थानच्या कोरड्या भागातही वर्षभर वाहते.

या मातीच्या छोट्या बंधाऱ्यांचा उद्देश पावसाचे पाणी अडवणे होता, जेणेकरून ते वाहून जाऊन वाया न जाता जमिनीत मुरेल. हळूहळू या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला. भूजल पातळी वाढली आणि दशकांच्या शांततेनंतर अरवरी नदी पुन्हा वाहू लागली. आज ही नदी राजस्थानच्या कोरड्या भागातही वर्षभर वाहते.

Follow Us