उन्हाळ्यात रसाळ आंब्यांचा आनंद घेताय? मग या पदार्थांपासून चार हात लांबच राहा!

उन्हाळ्यात रसरशीत आंबे खाताना कोणत्या ५ पदार्थांचे सेवन टाळावे, जेणेकरून तुमचे आरोग्य सुरक्षित राहील? वाचा ही सविस्तर बातमी.

| Updated on: May 13, 2026 | 3:10 PM
1 / 6
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला की बाजारपेठेत फळांचा राजा असलेल्या आंब्याची मोठी आवक सुरू होते. रसरशीत आंबे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते, मात्र आंबा खाताना आपण तो कशासोबत खातोय, याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही चुकीच्या खाद्यपदार्थांसोबत आंबा खाल्ला तर तुम्हाला पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला की बाजारपेठेत फळांचा राजा असलेल्या आंब्याची मोठी आवक सुरू होते. रसरशीत आंबे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते, मात्र आंबा खाताना आपण तो कशासोबत खातोय, याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही चुकीच्या खाद्यपदार्थांसोबत आंबा खाल्ला तर तुम्हाला पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

2 / 6
घरोघरी मँगो शेक आवडीने पितात. मात्र, आयुर्वेद आणि आहारतज्ज्ञांच्या मते, आंबा आणि दूध यांचे पचन होण्याचा वेग वेगळा असतो. आंबा लवकर पचतो, तर दूध पचायला जड असते. यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

घरोघरी मँगो शेक आवडीने पितात. मात्र, आयुर्वेद आणि आहारतज्ज्ञांच्या मते, आंबा आणि दूध यांचे पचन होण्याचा वेग वेगळा असतो. आंबा लवकर पचतो, तर दूध पचायला जड असते. यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

3 / 6
दह्यातील लॅक्टिक ॲसिड आणि आंब्यातील नैसर्गिक साखर एकत्र आल्यास शरीरातील उष्णता वाढते. यामुळे अपचन, गॅस किंवा त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

दह्यातील लॅक्टिक ॲसिड आणि आंब्यातील नैसर्गिक साखर एकत्र आल्यास शरीरातील उष्णता वाढते. यामुळे अपचन, गॅस किंवा त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

4 / 6
आंब्यासोबत संत्री, लिंबू किंवा मोसंबी यांसारखी आंबट फळे खाणे टाळावे. या दोन फळांच्या मिश्रणामुळे पोटात रासायनिक अभिक्रिया होऊन पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो.

आंब्यासोबत संत्री, लिंबू किंवा मोसंबी यांसारखी आंबट फळे खाणे टाळावे. या दोन फळांच्या मिश्रणामुळे पोटात रासायनिक अभिक्रिया होऊन पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो.

5 / 6
उन्हाळ्यात तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच आंबा खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमालीची वाढते. यामुळे ॲसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास जाणवू शकतो.

उन्हाळ्यात तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच आंबा खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमालीची वाढते. यामुळे ॲसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास जाणवू शकतो.

6 / 6
राजमा किंवा चणे यांसारखे पदार्थ खाल्ल्यानंतर आंबा खाणे टाळावे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने ते पचायला वेळ घेतात, परिणामी पचनक्रियेवर ताण येतो.

राजमा किंवा चणे यांसारखे पदार्थ खाल्ल्यानंतर आंबा खाणे टाळावे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने ते पचायला वेळ घेतात, परिणामी पचनक्रियेवर ताण येतो.

Follow Us