
जेव्हा आपल्याला वायरल फीवर(viral fever) आलेला असतो अशावेळी आपल्या शरीरातील पाणी कमी होऊन जाते आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा (weakness) जाणवू लागतो अशातच आपल्या शरीराला हायड्रेट(hydrate) ठेवण्यासाठी नारळाचे पाणी सेवन करणे अत्यंत उपयुक्त ठरते.

तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमितपणे दोन केळी सेवन करायला हवे.केळी मध्ये अनेक पोषक तत्त्वे उपलब्ध असतात जसे की पोटॅशियम, विटामिन बी सिक्स, मॅग्नेशियम त्याचबरोबर विटामिन सी ची मात्रा सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते अशावेळी दिवसभरातून आपण दोन केळी जरी नियमित खाल्ली तरी आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व प्राप्त होतात परिणामी अशक्तपणा दूर होतो.

जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण झाला असेल तर अशावेळी ड्रायफ्रूटस म्हणजेच सुकामेवाच्या मदतीने तुम्ही लवकरच अशक्तपणा दूर करू शकता. या ड्रायफ्रूट मध्ये उपलब्ध असणारे पदार्थांमुळे जसे की बदाम, पिस्ता, काजू, अंजीर , मनुके यामुळे तुमच्या शरीराला अतिरिक्त प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होईल आणि तुमचा अशक्तपणा लवकरच पळून जाईल.

आपले शरीर निरोगी राखण्यासाठी व आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे अशक्तपणा जाणवत असतो. या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने अशक्तपणामुळे निर्माण झालेली आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा भरून निघते.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसूणचे असे अनेक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे.वायरल इन्फेक्शन झाल्यावर आपल्याला सर्दी, खोकला यासारखे समस्या त्रास देतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण काही पदार्थ खाल्ले तर आपल्याला फरक जाणवतो म्हणूनच अशा वेळी लसूण या पदार्थाच्या अंगी उष्णता गुणधर्म असतात जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करते. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी लसूणा पासून बनवले गेलेले अनेक पदार्थ तुम्ही खाऊ शकतात उदाहरणार्थ गरम सूप, लसुणाची चटणी यामुळे सुद्धा तुम्हाला फरक जाणवू लागेल.