
हिंदू धर्मात गाईला माता मानले जाते. गाईला भाकर दिल्यानंतर पितृदोष, राहू-केतू, शनी सगळेच शांत होतात, असे म्हटले जाते. मात्र गाईला पोळी, भाकरी चारताना काही चुका करणं खूपच महागात पडू शकतं.

तुम्ही खाल्लेली भाकरी कदीच गाईला खायला देऊ नये. अर्धवट खाल्लेली भाकरी गाईला खायला दिल्याने पितृदोष वाढतो. तसेच याला गोमातेचा अपमान मानले जाते. त्यामुळे गाईला तुम्ही भाकरी खायला देत असाल तर ती ताजी असावी, असे सांगितले जाते.

गाईला मीठ असलेली भाकरी दिल्याने, पराठा दिल्याने शनी आणि राहू गृहांची अवकृपा होते, असे म्हटले जाते. त्यामुळे साधी आणि सरळ भाकरी दिली जावी. गुळाचीही भाकरी दिली जाऊ शकते. शास्त्रात तसे सांगण्यात आलेले आहे.

सूर्यास्तानंतर गोमातेला भाकरी खायला देऊ नये असे सांगितले जाते. संध्याकाळची वेळ ही पितरांची असते. त्यामुळे संध्याकाळी गाईला खायला दिल्यास पितृदोष वाढतो, असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.