IND va BAN : कष्ट प्रामाणिक असतील तर नशीबही संधी देते, अखेर त्या खेळाडूची टीम इंडियामध्ये निवड
टीम इंडियासाठी आणि बांगलादेशमध्ये 19 सप्टेंबरमध्ये दोन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमधील एका सामन्यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये एक असा खेळाडू आहे जो अनेक संकटांवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला चेन्नईमध्ये होणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीममध्ये अनेक बड्या खेळाडूंनी कमबॅक केलं आहे.

या टीममध्ये आयपीएलचा एक असा खेळाडू आहे, ज्याला त्याच्या ओव्हरमध्ये सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते. मात्र तिथूनही हार न मानता तो खेळाडू इथपर्यंत पोहोचला.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यश दयाल आहे. आयपीएलमध्ये केकेआरच्या रिंकू सिंहने त्याला पाच सिक्स मारले होते. त्यावेळी सर्वांना वाटले होते की या गोलंदाजाचे करियर संपले. पण यशने आपले कष्ट प्रामाणिकपणे सुरू ठेवले.

गुजरातने यशला रीलीज करून टाकलं, या धक्कामुळे त्यावेळी त्याचे 5-6 किलो वजन कमी झाले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला पाच कोटी रूपयांमध्ये विकत घेतलं होतं. आता तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल