Indian Railway Refund Rules: ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतरही रिफंड मिळणार, काय आहे नियम…

जर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करताना तिकीटाचे पैसे परत मिळाले तर काय मजा येईल ना ! हा विनोद नाहीए..भारतीय रेल्वेने आता तिकीटाचा रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करताना काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास संपल्यानंतरही तिकीटाचे काही पैसे परत मिळवू शकता. मात्र, यासाठी काही नियम आहे. हे नियम नेमके कोणते हे आपण पाहूयात..

ट्रेनचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट स्थितीत तुम्ही तुमचे भाडे परत मिळवू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला ट्रेनच्या टीटीईकडून एलसी सर्टीफिकेट्स मिळवावे लागेल. याचा अर्थ लोअर क्लास सर्टीफिकेट्स असतो. जेव्हा तुम्ही एलसी सर्टीफिकेट्स मिळेल तेव्हा तुम्हाला पैसे रिफंड मिळू शकतात.

प्रवास पूर्ण झाला तरी कोणत्या स्थिती पैसे परत मिळतील - प्रवास पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट परिस्थितीत तिकीटांचे पैशांचा काही भाग तुम्हाला मिळू शकतो. जर तुमच्या जवळ उच्च श्रेणीचे तिकीट आहे आणि काही कारणास्तव तु्म्हाला त्या कोचमध्ये प्रवास न करता त्याहून निम्न दर्जाच्या कोचमध्ये प्रवास करावा लागला. तर TTE कडून लोअर क्लास सर्टीफिकेट्स (LCC) जापी केले जाऊ शकते. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून दोन तिकीटांच्या किंमतीतील फरक तुम्हाला परत मिळू शकतो असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केव्हा मिळतो रिफंड? १ ) जर कोणत्या कारणांनी ट्रेन रद्द झाली तर तिकीटांचे संपूर्ण भाडे परत केले जाईल आणि यासाठी टीडीआर दाखल करण्याची गरज नाही.२ ) जर ट्रेन अंशत: रद्द झाली किंवा तिचा मार्ग बदलला तर रिफंड मिळतो, परंतू यासाठी टीडीआर फाईल करावा लागतो.

३ ) जर ट्रेन तिच्या निर्धारित प्रस्थान वेळेच्या तीन तास वा त्याहून अधिक वेळ लेट आहे आणि प्रवाशांना प्रवास करता आला नाही तर संपूर्ण रिफंड मिळण्यासाठी टीडीआर फाईल करावा लागेल. निर्धारित वेळेच्या आतच टीडीआर दाखल केल्यास प्रवासी संपूर्ण भाड्याच्या परताव्याचा दावा करु शकतो.