1 रुपये किलो साखर, 5 रुपये किलो तूप, 1947 रोजी होती इतकी स्वस्ताई, ‘या’ 8 वस्तूंची किंमत जाणून व्हाल थक्क

आता महागाई गगनाला भिडली आहे. बाजारात गेल्यानंतर पैसे कसे खर्च होतात कळत देखील नाही. पण एक काळ असा होता जेव्हा 20 रुपयांमध्ये सर्व उपयोगी सामान खरेदी करता येत होतं... तर 1947 मध्ये भारत स्वातंत्र झाला, तेव्हा किसी स्वस्ताई होती जाणूघ्या...

| Updated on: Aug 17, 2025 | 12:55 PM
1 / 8
जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे 1947 मध्ये सारखेची किंमत फक्त 1 रुपये किलो होती. आता साखर 45 - 50 रुपये किलो आहे.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे 1947 मध्ये सारखेची किंमत फक्त 1 रुपये किलो होती. आता साखर 45 - 50 रुपये किलो आहे.

2 / 8

गव्हाचं पीठ 30 पैसे प्रति किलो या किमतीत मिळत होतं, पण आता गव्हाच्या पिठाची किंमत 40 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे.

3 / 8

1947 मध्ये एक किलो तुपाची किंमत 5 रुपये प्रति किलो होती, जी आता 700 - 900 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

4 / 8

1947 मध्ये तांदळाचा भाव 12 पैसे प्रति किलो होता आणि आज तांदळाचा भाव 60 रुपये प्रति किलोच्या पुढे आहे.

5 / 8

1947 मध्ये देशाला स्वतंत्र्य मिळालं तेव्हा दुधाची किंमत 12 पैसे प्रति लिटर होती, पण आज ती 66 रुपये प्रति लिटर झाली आहे.

6 / 8

1947 मध्ये सायकलची किंमत फक्त 20 रुपये होती. पण तेव्हा 20 रुपये देखील फार मोठे होतं. आता साध्या सायकलची किंमत 5 हजार रुपयांपर्यंत आहे.

7 / 8

2025 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. पण 1947 मध्ये सोन्याचे दर 88.62रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

8 / 8

पेट्रोलबद्दल सांगायचं झालं तर, 1947 मध्ये पेट्रोलची किंमत फक्त 27 पैसे प्रति लिटर होती, पण आता पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us