
मुंबईकरांच्या नशीब हे घड्याळ्याच्या काट्याशी बांधलेलं आहे, असं पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते. सतत घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे मुंबईकर चक्क एकाच जागी, तब्बल 13 तास अडकून पडल्याचे मोठा गोंधळ झाला.

मँगलोर विमानतळावर काल रात्री पासून मुंबईकर नागरिक अडकून पडले होते.इंडिगो विमान कंपनीचं मँगलोर-मुंबई विमान अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांकडून मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक तास वाट पहावी लागल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

काही ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइट 6E-5150 रद्द झाली. ही फ्लाईट काल, म्हणजे मगंळवारी 2 डिसेंबर रोजी रात्री 9.25 ची होती, पण ती रद्द झाल्याने सर्व प्रवासी तिथेच रखडले. उड्डाण रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे . इंडिगोकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

याचा परिणाम म्हणून संपूर्ण विमानतळावर गोंधळाचं वातावरण होतं. वाट पहावी लागल्यामुळे वैतागलेल्या , संतपालेल्या प्रवाशांची विमानतळावरच इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी बाचाबाची देखील झाली. तब्बल 13 तास हे प्रवासी मंगलोर विमानतळावरच रखडले होते.

पर्यायी व्यवस्था झाली नाही,अपडेट्स मिळत नव्हते यामुळे प्रवाशांचा संताप अजूनच वाढला. याची तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.

संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, क्रूने प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण पर्यायी व्यवस्था न झाल्याने तसेच अडकून पडल्याने पुढली काम रखडल्याने प्रवासी वैतागले होते, त्यांच्या संतापाच्या लाटांचा सर्वांना सामना करावा लागला.