
बऱ्याचदा आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, नक्की काय खावे. एक तर काही खाण्याची इच्छा होत नाही आणि ते खाल्ल्याने अजून तब्येत खराब होणार नाही ना? याचीही भीती असते.

कधीही लक्षात ठेवा की, शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. अशात तब्येतीची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

उन्हाळ्यात जर तुम्हाला आजारी पडायचे नसेल तर काही गोष्टींचा आहारात समावेश करा. ज्यामुळे आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात पाणी जास्तीत जास्त प्या.

त्यामध्ये लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक आणि ओआरएस देखील प्या. बऱ्याचदा उन्हाळ्यात चक्कर आल्यासारखे वाटते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी प्या.

तसेच उन्हाळ्यात तब्येत खराब झाल्यासारखी वाटली की, पेय प्या. ज्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त समस्या या तिथेच दूर होतील. स्वत: हायड्रेट ठेवा आणि निरोगी राहा.