अचानक सुचलं आणि पहाटे 4 वाजता रेकॉर्ड केलं, 27 वर्षांपूर्वीचे हे गाणे ऐकल्यानंतर डोळ्यात येतं पाणी

बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत जी मनाला अगदी स्पर्श करुन जातात. त्यामधील एक गाण जवळपास 27 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. मात्र, आजही हे गाणं ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी येते.

| Updated on: Jun 02, 2026 | 11:49 AM
1 / 5
सध्या सर्वत्र बॉलिवूड गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. कधी प्रवास करताना किंवा एकटं वाटत असेल तर अनेकजण कानात हेडफोन घालून गाणी ऐकतात. पण ही गाणी लिहिण्यामागे, ती कंपोज करण्यामागे एक वेगळीच कथा दडलेली असते. सध्या बॉलिवूडमधील असेच एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे अनेकजण ब्रेकअप झाल्यानंतर ऐकतात. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणे गायकाला पहाटे 4 वाजता सुचलं होतं. जाणून घ्या या गाण्याविषयी...

सध्या सर्वत्र बॉलिवूड गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. कधी प्रवास करताना किंवा एकटं वाटत असेल तर अनेकजण कानात हेडफोन घालून गाणी ऐकतात. पण ही गाणी लिहिण्यामागे, ती कंपोज करण्यामागे एक वेगळीच कथा दडलेली असते. सध्या बॉलिवूडमधील असेच एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे अनेकजण ब्रेकअप झाल्यानंतर ऐकतात. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणे गायकाला पहाटे 4 वाजता सुचलं होतं. जाणून घ्या या गाण्याविषयी...

2 / 5

आम्ही कृष्णकुमार कुन्नाथ अर्थात सर्वांचा लाडका 'सिंगर केके' हा भारतीय संगीतसृष्टीतील एक असा अष्टपैलू गायका विषयी बोलत आहोत. त्याने 90 च्या दशकापासून ते २००० च्या दशकापर्यंत आपल्या आवाजाची भुरळ चाहत्यांवर कायम ठेवली. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट रोमँटिक आणि ब्रेकअप साँग्स दिली. मात्र, एका विशिष्ट गाण्याने त्यांच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळीच कलाटणी दिली.

3 / 5

केके यांच्या नावावर अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी असली, तरी एका विशेष गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तब्बल २७ वर्षांनंतरही हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात. हे गाणे म्हणजे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप के.' सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे, चित्रपटात जेव्हा ते दोघे वेगळे होतात, तेव्हा त्यांच्यातील विरहाची तीव्र वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते.

4 / 5

या हृदयद्रावक गाण्यामागे एक अतिशय रंजक किस्सा आहे. हे गाणे चक्क पहाटे ४ वाजता रेकॉर्ड करण्यात आले होते. सुरुवातीला या गाण्याचे संगीत तयार होत असताना केके थोडे धास्तावले होते. आपण हे विरहाचे आणि दुःखाचे गाणे गाऊ शकणार नाही, असे त्यांना वाटले होते आणि म्हणून त्यांनी याला नकार दिला होता. मात्र, संगीतकार इस्माईल दरबार यांचा केके यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे केके यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी हे गाणे गायला होकार दिला. या गाण्याचे हृदयस्पर्शी बोल मेहबूब यांनी लिहिले होते, तर केके आणि डॉमिनिक यांनी आपल्या आवाजाने ते कायमचे अजरामर केले.

5 / 5

केके यांच्या नावावर अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी असली, तरी एका विशेष गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तब्बल २७ वर्षांनंतरही हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात. हे गाणे म्हणजे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप के.' सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे, चित्रपटात जेव्हा ते दोघे वेगळे होतात, तेव्हा त्यांच्यातील विरहाची तीव्र वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us