
गेल्या दोन दिवसापासून विचित्र हवामानाचा अनुभव कोल्हापूर घेत आहेत. सकाळी थंडी दुपारी ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह पाऊस कसं वातावरण जिल्ह्यात अनुभवायला मिळतय.

या बदललेल्या वातावरणाचा परिणाम जनजीवनावर झालाय.. हवामान बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या तर जाणवत आहेत. कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात पाऊस होत असल्यानं नागरिकांची तारांबळ होत असल्याचं दिसून आलं होतं. आज मात्र नागरिक छत्री आणि रेनकोट सोबत घेऊन बाहेर पडल्याचं दिसू आलेय.

गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी पडणारा पाऊस पाडतात नागरिक सुरक्षेच्या साधनांसहच घराबाहेर पडताना पाहायला मिळताहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यांना हवामान विभागानं यलो अॅलर्ट दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान होतंय.

नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूरकरांना एकाच दिवसात तीन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असं चित्र आहे. यामुळं कोल्हापूरमधील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

कोल्हापूरमधील चंदगड आणि शिरोळ,नृसिंहवाडी, नांदणी ,जयसिंगपूर, शिरढोण, कुरूंदवाड , दत्तवाड आजरा, मलिग्रे, उतुर आणि गवसेमध्ये पाऊस झाला आहे.