
काळी मिरी आणि कॅरम बिया: ही देसी रेसिपी फार कमी लोकांना माहीती असली तरी ती खूप प्रभावीदेखील आहे. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि अजवाईन पावडर घेऊन गरम पाण्यासोबत त्याचे सेवन करा. तुम्ही जर रोज असे कराल तर अन्नपचन सहज होते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

गरम पाणी : तुम्हाला जर गरम पाणी पिण्याची सवय असेल तर पोटाच्या अनेक समस्यांवर त्याचा फायदा होतो. यासोबतच गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्हाला तेलकट पदार्थ खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्या. त्याचा तुमच्या तब्बेतीला नक्कीच फायदा होतो.

अजवाइन आणि काळे मीठ : पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी, भाजी किंवा कोशिंबीर एका भांड्यात घ्या आणि त्यात काळे मीठ पाण्यात मिसळा. हे पाणी उकळल्यानंतर ते थोडे थोडे प्या. या पद्धतीमुळे तेलकट अन्नदार्थाचे सहज पचन होते.

जेवणाचे नियोजन: जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खात असाल तर त्यानंतरच्या जेवणाचे तुम्हाला काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. जड अन्नानंतर तुम्ही पचायला हलका आहार घेत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होतो.

तुम्ही जेवण कसंही घेतला असला तरी जेवण झाल्यावर चालाण्याची सवय ठेवा. चालण्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात, आणि तुम्हाला दिवसभर फ्रेशही वाटत राहते. जेवल्यानंतर जुनी माणसं सांगतात की, शत पावली करा, त्याचा जास्त फायदा होतो.