Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
Team India 1st T20i Captain : टीम इंडियाचा सर्वात पहिला टी 20I कर्णधार कोण होता?

श्रेयस अय्यर भारताचा 15 वा टी 20I कर्णधार म्हणून नेतृ्त्व करत आहे. श्रेयसने आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतून कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. श्रेयस भारताला त्याच्या नेतृत्वात आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकून देण्यात अपयशी ठरला. भारताला आयर्लंडकडून 0-2 अशा एकतर्फी फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. या निमित्ताने आपण भारताचं नेतृत्व करणाऱ्या याआधीच्या 14 कर्णधारांबाबत जाणून घेणार आहोत.
टी 20I टीम इंडियाचा पहिला कॅप्टन कोण?
टीम इंडियाने 2006 साली पहिला टी 20I सामना खेळला होता. या पहिल्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग याने भारताचं नेतृत्व केलं होतं. या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याला कर्णधार करण्यात आलं होतं. महेंद्रसिंह धोनी याने त्याच्या नेतृत्वात आयसीसीचा पहिलाच टी 20I वर्ल्ड कप जिंकून दिला होता.
महेंद्रसिंह धोनी भारताचं सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारा कर्णधार राहिला. धोनीसह एकूण 14 कर्णधारांनी भारताचं किती टी 20I सामन्यांत नेतृत्व केलं? हे आपण जाणून घेऊयात.
