श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. श्रेयस देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. श्रेयसने टीम इंडियासाठी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्रेयसने 2015 साली आयपीएल पदार्पण केलं. श्रेयसने आयपीएल स्पर्धेत अनेक संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच श्रेयस अय्यर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 3 संघांना अंतिम फेरीत पोहचवणारा एकमेव कर्णधार आहे. श्रेयसने 2020 साली दिल्ली कॅपिट्ल्स, 2024 साली कोलकाता नाईट रायडर्स आणि 2025 मध्ये त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहचवलं आहे. श्रेयसने 2024 साली कोलकाताला त्याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
Read MoreIND Vs ZIM T20: भारताचा झिम्बाब्वेला क्लिन स्वीप, तिसऱ्या सामन्यात 35 धावांनी नमवलं
भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेला 3-0 ने नमवलं. तिसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान काही गाठता आलं नाही.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 26, 2026
- 8:12 pm
झिम्बाब्वेला मालिकेत नमवून भारताने इंग्लंडचा हिशेब केला पूर्ण, 14 दिवसातच इंग्रजांना शिकवला धडा
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. मात्र या मालिकेतून दोन सामन्यानंतर भारताने इंग्लंडचा हिशेब चुकता केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला आयसीसी क्रमवारीत मोठा फटका बसला होता. मात्र त्याची वसुली झिम्बाब्वे मालिकेत केली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 25, 2026
- 10:33 pm
IND vs ZIM: भारताने मालिका जिंकली, तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काय बदलणार? श्रेयस अय्यर म्हणाला…
भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. असं असताना तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काही बदल करणार का? या प्रश्नावर श्रेयस अय्यरने उत्तर दिलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 25, 2026
- 9:21 pm
झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय
भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने 219 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. यासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने पहिली टी20 मालिका जिंकली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 25, 2026
- 7:57 pm
IND vs ZIM: दुसर्या विजयानंतर टीम इंडियाला मिळणार 2 चांगल्या बातम्या, इंग्लंडचा हिशेबही होणार पूर्ण!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी20 सामना होत आहे. मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडियाला हा विजय महत्त्वाचा आहे. जर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर दोन आनंदाच्या बातम्या मिळतील. अशा स्थितीत भारताला हा सामना जिंकणं भाग आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 25, 2026
- 4:19 pm
IND vs ZIM, 2nd T20: नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला..
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका 2-0 ने जिंकणार आहे. त्यामुळे या सामन्यातील कामगिरीकडे भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 25, 2026
- 4:10 pm
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची सुरू असलेली मालिका अखेर खंडीत झाली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळाला आणि त्याच्या पाठीमागे सुरू असलेला पराभवाचा ससेमिरा संपला. या सामन्यातील विजयानंतर श्रेयस अय्यरने अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 23, 2026
- 8:29 pm
IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर 126 धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि झिम्बाब्वेला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ 20 षटकात 125 धावा करू शकला.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 23, 2026
- 6:18 pm
IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय मिळणार का? याकडे लक्ष लागून आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 23, 2026
- 4:12 pm
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?
भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत खऱ्या अर्थाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. कारण नेतृत्वा हाती घेतल्यापासून दोन मालिका गमावल्या आहेत. त्यात पहिल्या टी20 सामन्यात प्लेइंग 11 कशी निवडायची हा प्रश्न आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 22, 2026
- 2:36 pm
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा? पहिल्या विजयानंतर काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. पण दुसऱ्या सामन्यात कर्णधार बदलला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे. शुबमन गिलला नेमकं काय झालं? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 15, 2026
- 8:28 pm
टी20 क्रिकेटला पराभवाची उतरण, इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामनाही गमावला; श्रेयसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका पार पाडली. या सामन्यात इंग्लंडने भारताला 4-0 ने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 11, 2026
- 11:11 pm