पावसाळ्यात सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे का? जाणून घ्या याबद्दल अधिक !
देशाच्या विविध राज्यामध्ये पाऊस सुरू झाला आहे. मात्र, या हंगामात केस आणि त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या हंगामात ओलावा वाढल्यामुळे चिकटपणा जाणवतो. याशिवाय केस गळण्याची समस्याही वाढते.
1 / 5
देशाच्या विविध राज्यामध्ये पाऊस सुरू झाला आहे. मात्र, या हंगामात केस आणि त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या हंगामात ओलावा वाढल्यामुळे चिकटपणा जाणवतो. याशिवाय केस गळण्याची समस्याही वाढते. अशा परिस्थितीत आपल्याला त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
2 / 5
बहुतेक लोक उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन वापरतात, कारण सनस्क्रीनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. पावसाळ्यात हंगामात सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन लावावे. सन स्क्रीन त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे कार्य करते.
3 / 5
त्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस
4 / 5
केस स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केस धुणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अँटी-बॅक्टेरिया शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. कारण यावेळी बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. शॅम्पूनंतर कंडिशनर आठवणीने लावा. शक्यतो कंडिशनर चांगल्या कंपनीचे असावे.
5 / 5
तज्ञांच्या मते, बहुतेक लोक घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावतात. त्याचा जास्त फायदा होत नाही. बाहेर पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी नेहमीच सनस्क्रीन लावावी. हे आपल्या त्वचेवर खोलवर कार्य करते. तसेच सूर्यापासून आपल्या त्वचेचे रक्षण करते.